मूलभूत हक्क भाग 1 स्वाध्याय
मूलभूत हक्क भाग 1 स्वाध्याय इयत्ता सातवी नागरिकशास्त्र

प्रश्न. 1. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.
1) मूलभूत हक्क म्हणजे काय ?
उत्तर :
i) संविधानाने संपूर्ण लोकसमूहाच्या विकासासाठी पोषक परिस्थिती निर्माण करण्यासाठी भारतातील सर्व नागरिकांना समान हक्क दिले आहेत.
ii) अर्थात संविधानात समाविष्ट केलेल्या नागरिकांच्या हक्कांना मूलभूत हक्क असे म्हणतात.
2) विविध क्षेत्रांत गौरवास्पद कामगिरी करणाऱ्यांना शासनामार्फत कोणकोणती पदके/पदव्या दिल्या जातात ?
उत्तर :
विविध क्षेत्रांत गौरवास्पद कामगिरी करणाऱ्यांना शासनामार्फत पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण, भारतरत्न यांसारख्या पदव्या दिल्या जातात.
3) चौदा वर्षाखालील बालकांना धोक्याच्या ठिकाणी कामावर ठेवण्यास मज्जाव का केला आहे ?
उत्तर :
i) संविधानात बालकांचे शोषण थांबवण्यासाठी विशेष तरतूद केली आहे.
ii) कारखाने, खाणी यासंरख्या ठिकाणी बालकांची नेमणूक करून त्यांच्याकडून काम करून घेता येत नाही. म्हणून चौदा वर्षाखालील बालकांना धोक्याच्या ठिकाणी कामावर ठेवण्यास मज्जाव केला आहे.
4) संविधानाने भारतातील सर्व नागरिकांना समान हक्क का दिले आहेत ?
उत्तर :
i) जन्मलेल्या प्रत्येक बालकाला जगण्याचा हक्क असतो. त्याला उत्तम आरोग्य मिळावे. म्हणून संपूर्ण समाज आणि शासन प्रयत्न करते.
ii) अन्याय, शोषण, भेदभाव, वंचितता यांपासून जर सर्व व्यक्तींना संरक्षण मिळाले तरच व्यक्ती आपल्यातील गुणांचा आणि कौशल्यांचा विकास करू शकतील.
iii) स्वत:च्या आणि संपूर्ण लोकसमूहाच्या विकासासाठी पोषक परिस्थितीची मागणी करणे, त्यासाठी आग्रह धरणे म्हणजे हक्क मागणे होय. संविधानाने अशी पोषक परिस्थिती निर्माण करण्यासाठी भारतातील सर्व नागरिकांना समान हक्क दिले आहेत.
प्रश्न. 2. ‘स्वातंत्र्याचा हक्क’ या विषयावर चित्रपट्टी तयार करा.
उत्तर :
संविधानाने भारतीय नागरिकांना खालील प्रकारच्या स्वातंत्र्याची हमी दिली आहे.
i) भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्य – संविधानाने भारतीय नागरिकांना विचार करण्याचे आणि आपला विचार विविध माध्यमांतून व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य दिले आहे.
ii) सभा स्वातंत्र्य – शस्त्रे न बाळगता शांततेने एकत्र जमण्याचे स्वातंत्र्य नागरिकांना आहे. त्यानुसार सभा आयोजित करणे, शांततेने मोर्चा, प्रभातफेरी, निषेध सभा इत्यादींचे आयोजन करू शकतात.
iii) संघटना स्वातंत्र्य – समान विचारांचे लोक काही समान उद्दिष्टे प्राप्त करण्यासाठी एकत्र येतात. त्यांना संघटना स्थापन करण्याचे स्वातंत्र्य आहे.
iv) संचार स्वातंत्र्य – संविधानाने भारताच्या नागरिकांना देशाच्या कोणत्याही भागात मुक्तपणे वावरण्याचे स्वातंत्र्य दिले आहे.
v) वास्तव स्वातंत्र्य – भारताच्या नागरिकांना देशात कुठेही राहण्याचे व कायम वास्तव्य करण्याचे स्वातंत्र्य आहे.
vi) व्यवसाय स्वातंत्र्य – भारतीय नागरिक आपल्याला हवा तो कायदेशीर व्यवसाय करू शकतात.
vii) कोणत्याही व्यक्तीला बेकायदेशीरपणे अटक करता येत नाही.
viii) शासन कोणत्याही व्यक्तीचे जीवित व स्वातंत्र्य बेकायदेशीररीत्या हिरावून घेऊ शकत नाही.
प्रश्न. 3. खालील वाक्ये दुरुस्त करून पुन्हा लिहा.
1) कोणत्याही व्यक्तीला हक्क जन्मत:च प्राप्त होत नाहीत.
उत्तर :
कोणत्याही व्यक्तीला जन्मत:च हक्क प्राप्त होतात.
2) सरकारी नोकऱ्या देताना सरकार धर्म, लिंग, जन्मस्थान यांवर आधारित भेदभाव करून तुम्हांला नोकरीपासून दूर ठेवू शकते.
उत्तर :
सरकारी नोकऱ्या देताना सरकार धर्म, लिंग, जन्मस्थान यांवर आधारित भेदभाव करून तुम्हांला नोकरीपासून दूर ठेवू शकत नाही.
प्रश्न. 4. पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा.

उत्तर :
