सजीवांमधील जीवनप्रक्रिया स्वाध्याय इयत्ता नववी विज्ञान आणि तंत्रज्ञान

1. योग्य जोड्या जुळवून त्याबाबत स्पष्टीकरण लिहा.
| ‘अ’ स्तंभ | ‘ब’ स्तंभ |
|---|---|
| 1. बिजांडाच्या दिशेने होणारी परागनलिकेची वाढ | a. गुरुत्वानुवर्ती हालचाल |
| 2. प्ररोह संस्थेची होणारी वाढ | b. रसायन-अनुवर्ती हालचाल |
| 3. मूळ संस्थेची होणारी वाढ | c. प्रकाशानुवर्ती हालचाल |
| 4. पाण्याच्या दिशेने होणारी वाढ | d. वृद्धी असंलग्न हालचाल |
| e. जलानुवर्ती हालचाल |
उत्तर :
| ‘अ’ स्तंभ | ‘ब’ स्तंभ | स्पष्टीकरण |
|---|---|---|
| 1. बिजांडाच्या दिशेने होणारी परागनलिकेची वाढ | b. रसायन-अनुवर्ती हालचाल | रसायन-अनुवर्तन म्हणजे विशिष्ट रसायनांना वनस्पतीच्या ठरावीक भागांनी दिलेला प्रतिसाद. वनस्पतीच्या भागांची या प्रतिसादामुळे हालचाल होते. |
| 2. प्ररोह संस्थेची होणारी वाढ | c. प्रकाशानुवर्ती हालचाल | वनस्पतीची प्ररोह संस्था प्रकाशाच्या दिशेने वाढ दर्शवते. यामुळे प्ररोह संस्था ही नेहमीच प्रकाशानुवरती हालचाल दर्शवते. |
| 3. मूळ संस्थेची होणारी वाढ | a. गुरुत्वानुवर्ती हालचाल | वनस्पतीची मुळे गुरुत्वाकर्षणाच्या दिशेने हालचाल दर्शवतात. म्हणून मूळ संस्थेची वाढ ही गुरुत्वानुवर्ती हालचाल आहे. |
| 4. पाण्याच्या दिशेने होणारी वाढ | e. जलानुवर्ती हालचाल | जलानुवर्ती हालचाल दर्शवणारे वनस्पतीचे भाग म्हणजे पाण्याच्या दिशेने होणारी वाढ दाखवतात. वनस्पतींची मुळे जलानुवर्ती हालचाल दर्शवतात. |
2. परिच्छेद पूर्ण करा.
शेगडीवर दूध तापवण्यासाठी ठेवले होते. रसिका टीव्ही पहाण्यात मग्न होती. एवढ्यात तिला काहीतरी जळाल्याचा वास आला. ती धावतच स्वयंपाकघरात आली. दूध उकळून पातेल्याबाहेर येत होते. क्षणात तिने पातेले हाताने पकडले. पण ती लगेच ओरडली व पातेले सोडून दिले. ही कृती ……………… पेशींद्वारे नियंत्रित झाली. या पेशीतील ……………… च्या वैशिष्ट्यपूर्ण टोकाकडून माहिती ग्रहण केली गेली. तेथून ही माहिती ……………. कडे व तेथून ……………….. च्या टोकाकडे पाठवली गेली. टोकाकडे निर्माण झालेली रसायने चेतपेशीच्या अतिसूक्ष्म पोकळीतून म्हणजेच …………….. मधून जातात. अशा प्रकारे ……………. चे शरीरात वहन होते आणि आवेग …………….. कडून ……………… कडे पोहोचवले जाऊन …………….. क्रिया पूर्ण होते.
(चेतापेशी, स्नायूपेशी, आवेग, वृक्षिका, अक्षतंतू, संपर्कस्थान, प्रतिक्षिप्त, पेशीकाया)
उत्तर :
शेगडीवर दूध तापवण्यासाठी ठेवले होते. रसिका टीव्ही पहाण्यात मग्न होती. एवढ्यात तिला काहीतरी जळाल्याचा वास आला. ती धावतच स्वयंपाकघरात आली. दूध उकळून पातेल्याबाहेर येत होते. क्षणात तिने पातेले हाताने पकडले. पण ती लगेच ओरडली व पातेले सोडून दिले. ही कृती चेतापेशी पेशींद्वारे नियंत्रित झाली. या पेशीतील वृक्षिका च्या वैशिष्ट्यपूर्ण टोकाकडून माहिती ग्रहण केली गेली. तेथून ही माहिती पेशीकाया कडे व तेथून अक्षतंतू च्या टोकाकडे पाठवली गेली. टोकाकडे निर्माण झालेली रसायने चेतपेशीच्या अतिसूक्ष्म पोकळीतून म्हणजेच संपर्कस्थान मधून जातात. अशा प्रकारे आवेगां चे शरीरात वहन होते आणि आवेग चेतापेशी कडून स्नायूपेशी कडे पोहोचवले जाऊन प्रतिक्षिप्त क्रिया पूर्ण होते.
3. टीपा लिहा.
मूलदाब, बाष्पोच्छ्वास, चेतापेशी, मानवी मेंदू, प्रतिक्षिप्त क्रिया.
1) मूलदाब
उत्तर :
i) मुळांच्या पेशी या जमिनीतील पाणी खनिजे यांच्या संपर्कात असतात.
ii) संहतीमध्ये असलेल्या फरकामुळे पाणी आणि खनिजे मुळांच्या पृष्ठभागावरील पेशींमध्ये शिरतात, यामुळे या पेशी ताठर होतात. त्यामुळे त्यांच्या लगतच्या पेशीवरत्या दाब निर्माण करतात. यालाच मूलदाब असे म्हणतात.
iii) या दाबामुळे पाणी आणि खनिजे मुळांच्या जलवाहिनीपर्यंत पोहोचतात आणि संहतीतील हा फरक भरून काढण्यासाठी ती पुढे पुढे ढकलली येतात.
iv) या सततच्या हालचालीमुळे पाण्याचा एक स्तंभ तयार होतो, जो सातत्याने पुढे ढकलला जातो. हा दाब झुडपे, लहान वनस्पती तसेच लहान वृक्षांमध्ये पाणी वर चढवण्यासाठी पुरेसा असतो.
2) बाष्पोच्छ्वास
उत्तर :
i) वनस्पती पानांवरील पर्णरंध्राच्या मार्फत बाष्परुपाने पाणी बाहेर टाकतात.
ii) पर्णरंध्राभोवती दोन बाह्य आवरणयुक्त पेशी असतात त्यांना रक्षक पेशी म्हणतात.
iii) या पेशी पर्णरंध्राची उघडझाप करण्यावर नियंत्रण ठेवतात.
iv) या पर्णरंध्रातून बाष्पोत्सर्जन होते. या क्रियेला बाष्पोच्छ्वास असे म्हणतात.
v) पानांमार्फत बाष्पीभवन क्रियेमुळे पाणी वातावरणात सोडले जाते. यामुळे पानाच्या अपईत्वचेतील पाण्याचे प्रमाण कमी होते.
vi) हे पाण्याचे प्रमाण भरून काढण्यासाठी जलवाहिन्यांमार्फत पाणी पानांपर्यंत आणले जाते. बाष्पोच्छ्वासामुळे पाणी व खनिजे शोषून घेणे आणि ते सर्व भागांना पोहोचवणे यासाठी मदत होते.
3) चेतापेशी
उत्तर :
i) शरीरात एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणी संदेशवहनाचे कार्य करणाऱ्या विशेष प्रकारच्या पेशींना चेतापेशी असे म्हणतात.
ii) चेतापेशी या मानवी चेतासंस्थेतील रचनात्मक व कार्यात्मक घटक आहेत.
iii) मानवी शरीरातील आकाराने सर्वांत मोठ्या असणाऱ्या चेतापेशींची लांबी काही मीटरपर्यंत भरते.
iv) चेतापेशींमध्ये विद्युत रासायनिक आवेग निर्माण करण्याची व वहन करण्याची क्षमता असते.
v) चेतापेशींना आधार देणाऱ्या व त्यांच्या कार्यात मदत करणाऱ्या पेशींना चेताबंध असे म्हणतात. चेतापेशी आणि चेताबंध यांच्या साहाय्याने चेता बनतात.
4) मानवी मेंदू
उत्तर :
i) मेंदूची रचना : मेंदू एक नाजूक पण अत्यंत विकसित अवयव आहे, जो कर्पर आणि मेरुरज्जूसह संरक्षित असतो.
ii) प्रमस्तिष्क-मेरुद्रव : मेंदूतील पोकळ्यांमध्ये असणारा द्रव, मध्यवर्ती चेतासंस्थेला पोषक पुरवतो आणि संरक्षण करतो.
iii) मेंदूचे वजन : प्रौढ मानवाचा मेंदू सुमारे 1300-1400 ग्रॅम वजनाचा असून तो 100 अब्ज चेतापेशींची बनलेला असतो.
iv) मेंदूचे भाग : मेंदूचे तीन मुख्य भाग आहेत : प्रमस्तिष्क, अनुमस्तिष्क आणि मस्तिष्कपुच्छ.
v) प्रमस्तिष्क : सर्वात मोठा भाग, जो ऐच्छिक हालचाली, एकाग्रता, नियोजन, निर्णयक्षमता, स्मरणशक्ती आणि बुद्धिमत्तेसाठी जबाबदार आहे.
vi) अनुमस्तिष्क : छोटा भाग, जो शरीराचा तोल आणि ऐच्छिक हालचालींमध्ये सुसूत्रता आणतो.
vii) मस्तिष्कपुच्छ : अनैच्छिक क्रिया जसे कि ह्रदयाचे ठोके, श्वासोच्छ्वास आणि रक्तप्रवाह नियंत्रित करणारा भाग.
5) प्रतिक्षिप्त क्रिया
उत्तर :
i) पर्यावरणातील एखाद्या घटनेला अनैच्छिकरित्या क्षणार्धात दिलेला प्रतिसाद म्हणजेच प्रतिक्षिप्त क्रिया होय.
ii) आपण काही घटनांना काहीही विचार न करता प्रतिक्रिया देतो किंवा त्या प्रतिक्रियेवर आपले कोणत्याही प्रकारचे नियंत्रण नसते. या कृती म्हणजे पर्यावरणातील उद्दीपनांना दिलेला प्रतिसादच होय.
iii) अशा परिस्थितीत मेंदूशिवायही नियंत्रण व समन्वय योग्यप्रकारे राखला जातो.
iv) प्रतिक्षिप्त क्रियेला मार्ग पुढीलप्रमाणे असतो :
ज्ञानेंद्रिय → संवेदी चेतापेशी → मेरुरज्जूकडे → सहयोगी चेतापेशी → प्रेरक चेता → पेशी → स्नायुपेशी किंवा ग्रंथी
4. खालील नमूद ग्रंथींची संप्रेरके व कार्ये स्पष्ट करा.
पियुषिका, अवटु, अधिवृक्क, यौवनलोपी, वृषणग्रंथी, अंडाशय
1) पियुषिका
उत्तर :
पियुषिका ही महत्त्वाची अंत:स्त्रावी ग्रंथी आहे. या ग्रंथींची संप्रेरके पुढीलप्रमाणे आहेत :
i) वृद्धी संप्रेरक : हाडांच्या वाढीला चालना देणे.
ii) अधिवृक्क ग्रंथी संप्रेरक : अधिवृक्क ग्रंथीच्या स्रवण्यास चालना देणे.
iii) अवटु ग्रंथी संप्रेरक : अवटु ग्रंथींच्या स्रवण्यास चालना देणे.
iv) प्रोलॅक्टीन : मातेस दुग्धोत्पादन करण्यास प्रवृत्त करणे.
v) पुटिका ग्रंथी संप्रेरक : जननग्रंथींची वाढ नियंत्रित करणे.
vi) ल्युटिनायझिंग हामोंन : मासिक पाळीचे नियंत्रण करणे, अंडमोचन करणे.
vii) ऑक्सिटोसीन : मूल जन्मास येताना गर्भाशय आकुंचित करणे.
viii) प्रतिमूत्रल संप्रेरक : शरीरातील पाण्याचे प्रमाण संतुलित करणे.
2) अवटु
उत्तर :
थायरॉक्झीन : शरीराची वाढ व चयापचय क्रिया नियंत्रित करणे.
कॅल्सिटोनीन : कॅल्शिअमच्या चयापचयाचे व रक्तातील कॅल्शिअमचे नियंत्रण करणे.
3) अधिवृक्क
उत्तर :
ॲड्रेनॅलिन : आणीबाणीच्या तसेच भावनिक प्रसंगी वर्तन नियंत्रण करणे.
नॉरॲड्रेनॅलिन : ह्रदय व त्याच्या संवहनी संस्थेचे उद्दीपन करणे व चयापचय क्रियेला उत्तेजन देणे.
कॉर्टिकोक्स्टेरॉइड : Na, K चे संतुलन व चयापचय क्रियेला उत्तेजन देणे.
4) यौवनलोपी
उत्तर :
थायमोसीन : प्रतिकार शक्ती निर्माण करणाऱ्या पेशींवर नियंत्रण ठेवणे.
5) वृषणग्रंथी
उत्तर :
टेस्टेस्टेरॉन : पुरुषांच्या दुय्यम लक्षणांचा विकास जसे दाढी, मिश्या येणे, आवाजात घोगरेपणा येणे.
6) अंडाशय
उत्तर :
इस्ट्रोजन : स्त्रियांमध्ये गर्भाशयाच्या अंत:स्तराची वाढ, स्त्रियांच्या दुय्यम लैंगिक गुणांचा विकास करणे.
प्रोजेस्टेरॉन : गर्भाशयाच्या अंत:स्तरास गर्भधारणेसाठी तयार करणे, गर्भधारणेस मदत करणे.
5. सुबक व नामनिर्देशित आकृत्या काढा.
मानवी अंतस्त्रावी ग्रंथी, मानवी मेंदू, नेफ्रॉन, चेतपेशी, मानवी उत्सर्जन संस्था
1) मानवी अंतस्त्रावी ग्रंथी
उत्तर :

2) मानवी मेंदू :
उत्तर :

3) नेफ्रॉन
उत्तर :

4) चेतापेशी
उत्तर :

5) मानवी उत्सर्जन संस्था
उत्तर :

6. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा.
अ. मानवी शरीरातील रासायनिक नियंत्रण कसे होते हे सांगून काही संप्रेरकांची नावे व त्यांचे कार्य विशद करा.
उत्तर :
i) आपल्या शरीरात संप्रेरके या रासायनिक पदार्थामार्फत समन्वय व नियंत्रण केले जाते, अंतस्त्रावी ग्रंथीतून संप्रेरके स्त्रवतात. या ग्रंथींना वाहिनी विरहित ग्रंथी असेही म्हटले जाते.
ii) या ग्रंथीकडेट त्याचा स्त्राव साठवण्यासाठी किंवा त्या स्त्रावाचे वहन करण्यासाठी कोणत्याही वाहिन्या नसतात. म्हणून ही संप्रेरके तयार होतात ती सरळ रक्तप्रवाहात मिसळली जातात.
iii) या अंतस्त्रावी ग्रंथी शरीरामध्ये जरी ठरावीक ठिकाणीच असल्या तरी त्यांची संप्रेरके रक्ताद्वारे शरीराच्या सर्व भागात पोहोचतात.
iv) अंतस्त्रावी ग्रंथी चेतासंस्थेच्या बरोबरीने नियंत्रण व समन्वयाची जबाबदारी पार पडतात. शरीरातील विविध क्रियांचे नियंत्रण व एकात्मीकरण करण्याचे कार्य व दोन्ही संस्था एकमेकींच्या मदतीने करतात.
| संप्रेरके | कार्य |
|---|---|
| 1) पॅराथाॅर्मोन | शरीरातील कॅल्शिअम व फॉस्फरसच्या चयापचाचे नियंत्रण करणे. |
| 2) थायमोसीन | प्रतिकार शक्ती निर्माण करणाऱ्या पेशींवर नियंत्रण ठेवणे. |
| 3) थायरॉक्झीन | शरीराची वाढ व चयापचय क्रिया नियंत्रित करणे. |
| 4) कॅल्सिटोनीन | कॅल्शिअमच्या चयापचयाचे व रक्तातील कॅल्शिअमचे नियंत्रण करणे. |
आ. मानवी व वनस्पती उत्सर्जन संस्थेतील फरक स्पष्ट करा.
उत्तर :
| मानवी उत्सर्जन | वनस्पती उत्सर्जन |
|---|---|
| i) मानवी उत्सर्जन क्रिया ही कठीण असते. | i) वनस्पतींमधील उत्सर्जनाची क्रिया ही सोपी असते. |
| ii) मानवी उत्सर्जन क्रिया करण्यासाठी विकसित करण्यासाठी विकसित अवयव असलेली उत्सर्जन संस्था असते. | ii) वनस्पतींमध्ये टाकाऊ पदार्थ बाहेर टाकण्यासाठी विशेष उत्सर्जक अवयव किंवा उत्सर्जक संस्था नसते. |
| iii) मानवी शरीरात रक्ताची गाळण क्रिया होऊन नायट्रोजनयुक्त पदार्थ शरीराबाहेर टाकला जातो. | iii) वनस्पतींमध्ये विसरण क्रियेद्वारे वायूरूप पदार्थ बाहेर टाकले जातात. |
| iv) मानवी उत्सर्जित पदार्थ म्हणजे युरिया, अमोनिया हे असतात. | iv) वनस्पती उत्सर्जित पदार्थ म्हणजे राळ, डिंक यांसारखे पदार्थ असतात. |
इ. वनस्पतींमधील समन्वय कशा प्रकारचा असतो याचे सोदाहरण स्पष्टीकरण द्या.
उत्तर :
वनस्पतींमध्ये चेतासंस्था किंवा स्नायू संस्था नसतानाही, बाह्य उद्दीननास प्रतिसाद म्हणून विविध हालचाली होतात. या हालचालींना वृद्धी-संलग्न आणि वृद्धी-असंलग्न हालचाली म्हणतात, तसेच त्यांना अनुवर्ती हालचाली असेही म्हणतात.
वृद्धी-संलग्न हालचाली : वनस्पतींच्या वाढीशी संबंधित हालचाली.
i) प्रकाशानुवर्तन : खोड प्रकाशाच्या दिशेने वाढते.
ii) गुरुत्वानुवर्तन : मूळ गुरुत्वाकर्षणाच्या दिशेने वाढते.
iii) जलानुवर्तन : मूळ पाण्याच्या दिशेने वाढते.
iv) रसायन-अनुवर्तन : विशिष्ट रसायनांना प्रतिसाद देऊन हालचाल होते. उदा.: परागनलिकेची वाढ.
वृद्धी-असंलग्न हालचाली :
गती वाढीशी संबंधित नसते, परंतु बाह्य बदलांना प्रतिसाद म्हणून होते.
उदा.: लाजाळू वनस्पती रासायनिक आदेशांद्वारे हालचाल करते.
पेशींतील पाण्याचे प्रमाण बदलल्याने त्यांचा आकार बदलतो आणि हालचाल होते.
वनस्पती संप्रेरकांच्या मदतीने समन्वय साधतात आणि विविध उद्दीपनांना प्रतिसाद देतात.
7. तुमच्या शब्दात सोदाहरण स्पष्टीकरण द्या.
अ. समन्वय म्हणजे काय ?
उत्तर :
i) कोणताही प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण होण्यासाठी त्या प्रक्रियेच्या प्रत्येक टप्प्यांवर सहभागी होणाऱ्या विविध संस्था व अवयव यांमध्ये असणारे नियमन म्हणजे समन्वय होय.
ii) उदा. समन्वय अभावामुळे कधी कधी जेवण करत असतांना अचानक हाताने बोट किंवा जीभ दाताखाली येते.
आ. मानवी उत्सर्जन ही प्रक्रिया कशी चालते ?
उत्तर :
उत्सर्जन म्हणजे शरीरातील हानिकारक व नको असलेल्या पदार्थाचे बाहेर टाकणे.
मूत्रपिंड तंत्र : मूत्रपिंड रक्त फिल्टर करून युरिया, अतिरिक्त पाणी व क्षार मूत्राच्या स्वरूपात बाहेर टाकते, उदा. भरपूर पाणी पिल्यावर जास्त प्रमाणात मूत्र निर्माण होते.
त्वचा : घामाच्या माध्यमातून पाणी, क्षार, व यूरिया बाहेर टाकते. उदा. व्यायाम केल्यानंतर घाम येणे.
श्वसन तंत्र : फुफ्फुसांद्वारे कार्बन डायऑक्साइड व पाण्याची वाफ बाहेर टाकली जाते. उदा. दीर्घ श्वास घेतल्यावर कार्बन डायऑक्साइड बाहेर टाकणे.
पाचन तंत्र : मोठ्या आतड्याद्वारे अन्नाचे पचन न झालेले अंश मलद्वारातून बाहेर टाकले जातात. उदा. पचन झाल्यानंतर मलविसर्जन होणे.
इ. वनस्पतींमधील उत्सर्जन मानवी जीवनास कसे उपयुक्त ठरते ?
उत्तर :
i) ऑक्सिजन जे प्रकाशसंश्लेषणाचे उत्सर्जित उत्पादन आहे, ही मानवाला पृथ्वीवर टिकून राहण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे.
ii) टॅनिन हे एक टाकाऊ वनस्पती उत्पादन आहे जे पाने आणि साल मध्ये साठवले जाते. जगभरात चहा बनवण्यासाठी त्याचा वापर केला जातो.
iii) झाडे निरुपयोगी पदार्थ त्यांच्या पानांमध्ये आणि सालांमध्ये साठवतात जी नियमितपणे बाहेर पडतात. हे खतनिर्मिती करण्यासाठी वापरले जातात.
iv) डिंक आणि राळ ही वनस्पतींसाठी टाकाऊ पदार्थ आहेत पण माणसासाठी त्यांचे विविध उपयोग आहेत.
v) तेल हे वनस्पतींचे अत्यावश्यक टाकाऊ पदार्थ आहेत जे त्यांच्या पानांमध्ये साठवले जातात. हे अत्यावश्यक तेल माणसाद्वारे विविध कारणांसाठी वापरली जातात.
ई. वनस्पतींमधील परिवहन कसे होते ?
उत्तर :
वनस्पतींमध्ये जलवाहिन्या आणि रसवाहिन्या यांच्यामार्फत जल व अन्नाचे परिवहन होते. यासाठी मूलदाब आणि बाष्पोच्छ्वास महत्त्वाच्या भूमिका बजावतात.
मूलदाब :
मुळांच्या पृष्ठभागावरील पेशी जमिनीतील पाणी आणि खनिजे शोषतात.
पेशींमध्ये संहतीच्या फरकामुळे पाणी व खनिजे प्रवेश करतात, त्यामुळे पेशी ताठर होतात आणि दाब निर्माण होतो.
हा मूलदाब पाणी आणि खनिजे जलवाहिन्यांपर्यंत पोहोचवतो व पुढे ढकलतो.
झुडपे व लहान झाडांमध्ये पाणी वर चढवण्यासाठी हा दाब महत्त्वाचा असतो.
बाष्पोच्छ्वास :
पानांवरील पर्णरंध्रांमधून बाष्परूपात पाणी बाहेर टाकले जाते.
रक्षक पेशी पर्णरंध्र उघडण्यावर नियंत्रण ठेवतात.
बाष्पोच्छ्वासामुळे पानांच्या अपित्वचेतील पाणी कमी होते, आणि जलवाहिन्यांद्वारे पाणी पानांपर्यंत पोहोचते.