तू झालास मूक समाजाचा नायक स्वाध्याय
तू झालास मूक समाजाचा नायक स्वाध्याय इयत्ता दहावी मराठी

१) खालील आकृत्या पूर्ण करा.
अ)
१) डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी नाकारलेली गोष्ट –
उत्तर :
मळवाट
२) डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्वागत करणारे –
उत्तर :
खाचखळगे
आ)

उत्तर :

२) कवितेतील संदर्भ आणि स्पष्टीकरणे यांच्या जोड्या लावा.
| कवितेतील संदर्भ | स्पष्टीकरण |
|---|---|
| १) मळवाट | अ) अन्यायाविरुद्ध आवाज उठवू न शकणारा समाज |
| २) खाचखळगे | आ) पारंपरिक वाट |
| ३) मूक समाज | इ) अडचणी, कठीण परिस्थिती |
उत्तर :
| कवितेतील संदर्भ | स्पष्टीकरण |
|---|---|
| १) मळवाट | आ) पारंपरिक वाट |
| २) खाचखळगे | इ) अडचणी, कठीण परिस्थिती |
| ३) मूक समाज | अ) अन्यायाविरुद्ध आवाज उठवू न शकणारा समाज |
३) चवदार तळ्याच्या घटनेनंतरच्या पन्नास वर्षात वातावरणात झालेल्या बदलाचे वर्णन करणाऱ्या ओळी लिहा.
उत्तर :
i) बिगूल प्रतीक्षा करीत आहे.
ii) चवदार तळ्याचे पाणी थंड झाले आहे.
iii) सूर्यफुले ध्यास घेत आहेत.
४) चवदार तळ्याच्या घटनेसंदर्भाने तुलना करा.
| पन्नास वर्षापूर्वीची परिस्थिती | पन्नास वर्षानंतरची परिस्थिती |
|---|---|
| ……………….. | ……………….. |
| ……………….. | ……………….. |
| ……………….. | ……………….. |
उत्तर :
| पन्नास वर्षापूर्वीची परिस्थिती | पन्नास वर्षानंतरची परिस्थिती |
|---|---|
| सूर्यफुलांनी पाठ फिरवली होती. | सूर्यफुले ध्यास घेत आहेत. |
| रणशिंग फुंकले होते. | आता बिगूल वाट पाहत आहे. |
| चवदार तळ्याचे पाणी पेटले होते. | आता चवदार तळ्याचे पाणी थंड आहे. |
५) काव्यसौंदर्य
अ) ‘तुझे शब्द जसे की
महाकाव्ये तुझ्या पायाजवळ गळून पडावीत
तुझा संघर्ष असा की
काठ्यांच्या संगिनी व्हाव्यात.’, या ओळींचे रसग्रहण करा.
उत्तर :
आशयसौंदर्य : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी प्रस्थापित वर्णव्यवस्थेविरुद्ध महाड येथे चवदार तळ्याचा जो संग्राम केला व शोषितांवरील अन्यायाविरुद्ध लढा उभारला, त्याच्या पन्नास वर्षे पूर्तीनंतर कवी ज. वि. पवार यांनी ‘तू झालास मूक समाजाचा नायक’ या कवितेमध्ये आपले मनोगत व्यक्त केले आहे.
काव्यसौंदर्य : उपरोक्त ओळींमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शब्दांची किमया आणि संघर्षाचा परिणाम यांची महती कथन केली आहे. चवदार तळ्यावर सर्वासाठी पाणी खुले करताना महामानवाने जी घोषणा केली, त्या शब्दांपुढे सर्व महाकाव्ये नतमस्तक व्हावीत अशी होती. तसेच जो संघर्ष केला त्याचा प्रभाव असा पडला की शोषितांच्या हातातल्या काठ्या जणू जहाल बंदुका झाल्या. डॉ. बाबासाहेबांचा शब्द व संघर्षाचे सामर्थ्य यातून व्यक्त होते.
भाषिक वैशिष्ट्ये : मुक्तछंदात (मुक्तशैली) लिहिलेली ही कविता, त्यातील ओजस्वी शब्दकळेमुळे कार्यकर्त्याच्या काळजाला थेट भिडते. काव्यात्म पण थेट विधानांमुळे त्यातील विचार परिणामकारक झाले आहेत. ‘महाकाव्याची नम्रता’ व ‘काठ्यांच्या बंदुका’ या प्रत्येकी शांतरस व अद्भुतरस यांची निर्मिती करतात.
आ) डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे कवितेतून जाणवलेले कर्तृत्व तुमच्या शब्दांत लिहा.
उत्तर :
पारंपरिक वर्णव्यवस्थेने नाकारलेल्या व दैन्य, दारिद्र्याच्या अंधारात खितपत पडणाऱ्या मूक समाजाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी नवविचारांचा प्रकाश दाखवला. अन्यायाविरुद्ध न बोलणाऱ्या समाजात जागृती निर्माण केली. सर्व सुखांनी पाठ फिरवलेली असताना व अडचणींना मार्ग असताना पारंपरिक वाटेने जायचे नाकारून, कठीण परिस्थितीवर मात करून डॉ. बाबासाहेबांनी नवा इतिहास घडवला. बहिष्कृत भारताला आत्मविश्वास दिला. अगाध ज्ञानाच्या बळावर लढा पुकारून शोषित जनतेच्या पायातल्या बेड्या मुक्त केल्या. चवदार तळ्याचा संग्राम यशस्वी केला. अशा प्रकारे पीडित व शोषित समाजाला सन्मानाने जगायला शिकवले.
इ) अगाध ज्ञानाच्या बळावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेले कार्य, तुमच्या शब्दांत थोडक्यात लिहा.
उत्तर :
अतिशय कठीण परिस्थितीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपले शिक्षण पूर्ण केले. त्यांनी बॅरिस्टर ही पदवी संपादन केली. ते उच्च विद्याविभूषित होते. त्यांनी आपल्या अगाध ज्ञानाच्या बळावर इथल्या बहिष्कृत समाजाला अन्यायापासून मुक्त करण्याचे अतिशय महत्त्वाचे कार्य अंगिकारले. शोषित, पीडित व वर्णव्यवस्थेतून नाकारलेल्या, समृद्धीपासून वंचित असलेल्या जनतेला संघटित केले. त्यांनी ‘शिका, संघटित व्हा व संघर्ष करा’ हा मूलमंत्र देऊन शोषित समाजाला आत्मविश्वास दिला. अन्यायाविरुद्ध लढा देण्यास प्रवृत्त केले. चवदार तळ्याचा संग्राम यशस्वी केला. समाजाला बोधितत्त्वाची शिकवण देऊन बौद्ध धर्म स्वीकारला. स्वतंत्र भारताचे संविधान लिहून भारतीय राज्यघटनेचे ते शिल्पकार ठरले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना, त्यांच्या अगाध कर्तृत्वाला मानवंदना देण्यासाठी ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च बहुमान सन्मानाचे बहाल करण्यात आला.