नियम सर्वासाठी स्वाध्याय

नियम सर्वासाठी स्वाध्याय

नियम सर्वासाठी स्वाध्याय इयत्ता पाचवी परिसर अभ्यास भाग 1

1. रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा.

अ) आपले सामाजिक जीवन ………………. आधारे चालते.

उत्तर :

आपले सामाजिक जीवन नियमांच्या आधारे चालते.

आ) स्वतंत्र भारताच्या संविधानाने ………………. प्रथा नष्ट केली.

उत्तर :

स्वतंत्र भारताच्या संविधानाने अस्पृश्यतेची प्रथा नष्ट केली.

इ) चुकीच्या रूढी-परंपरामुळे समाजातील काही लोकांच्या वाट्याला ………………. येते.

उत्तर :

चुकीच्या रूढी-परंपरामुळे समाजातील काही लोकांच्या वाट्याला उपेक्षा येते.

2. पुढील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा.

अ) नियम का तयार करावे लागतात ?

उत्तर :

समाजातील प्रत्येकाची जबाबदारी व कर्तव्ये कोणती आहेत हे कळावे आणि कोणावरही अन्याय होऊ नये, यासाठी नियम तयार करावे लागतात.

आ) आपल्या सामाजिक जीवनात कोणती मूल्ये प्राचीन काळापासून आहेत ?

उत्तर :

आपल्या सामाजिक जीवनात ‘अहिंसा’ आणि ‘शांतता’ ही मूल्ये प्राचीन काळापासून आहेत.

इ) आपल्या सामाजिक जीवनातील मोठ्या अडचणी कोणत्या ?

उत्तर :

‘गरिबी’ आणि ‘शिक्षणाचा अभाव’ या आपल्या सामाजिक जीवनातील मोठ्या अडचणी आहेत.

3. पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा.

अ) कोणत्या अनिष्ट प्रथा कायद्याने बंद केल्या ?

उत्तर :

i) आपण जातिभेद व अस्पृश्यता कायद्याने बंद केली.

ii) सती, बालविवाह यांसारख्या रुढींवर कायद्याने बंदी घातली.

iii) जादुठोणा, हुंडा पद्धती यांसारख्या पद्धती आपण कायद्याने बंद केल्या.

iv) बालविवाह, बालकामगार अशा अनिष्ठ प्रथांवरही आपण बंदी घातली आहे.

आ) पर्यावरणाच्या रक्षणासाठी नियम का करावे लागतात ?

उत्तर :

i) आपल्या अनेक बाबतींत निसर्गावर अवलंबून असतो.

ii) आपल्या अनेक गरजांची पूर्तता निसर्गामुळे होते.

iii) आपल्यानंतर येणाऱ्या पिढ्यांनाही नैसर्गिक साधनसंपत्ती पुरली पाहिजे; म्हणून पर्यावरणाच्या या साधनसंपत्तीचे रक्षण करण्यासाठी नियम करण्याची आवश्यकता असते.

Leave a Comment