संतवाणी स्वाध्याय इयत्ता आठवी

संतवाणी स्वाध्याय इयत्ता आठवी

संतवाणी स्वाध्याय इयत्ता आठवी मराठी

अ) संत तुकाराम

प्रश्न. 1. आकृती पूर्ण करा.

उत्तर :

प्रश्न. 2. सुचनेनुसार सोडवा.

अ) ‘धन’ हे उत्तर येईल असा प्रश्न तयार करा.

उत्तर :

संत तुकाराम महाराजांच्या घरी शब्दांच्या रत्नांचे काय आहे.

आ) संत तुकाराम महाराज शब्दांचा गौरव करतात कारण ……………

उत्तर :

संत तुकाराम महाराज शब्दांचा गौरव करतात, कारण शब्द हा त्यांचा देव आहे.

प्रश्न. 3. खालील संकल्पना स्पष्ट करा.

अ) शब्दांचीच रत्ने –

उत्तर :

त्यांच्यापाशी पैसा – अडका नसतो. पण त्यांच्याकडे लोकांना उपदेश करणारे शब्द असतात. ते शब्द इतके अनमोल असतात की त्या शब्दांना संत तुकाराम महाराजांनी ‘अमूल्य रत्ने’ असे म्हटले आहे.

आ) शब्दांचीच शस्त्रे –

उत्तर :

संतांकडे लोकांना मार्गदर्शन करणारे शब्द असतात. शस्त्रांनी जसा शत्रुवर विजय मिळवता येतो, तसे शब्दरुपी शस्त्रांनी लोकांच्या मनातील विकारांचा पराभव करता येतो. म्हणून संतांकडे असणारे शब्द हे शस्त्रे आहेत, असे संत तुकाराम महाराजांनी म्हटले आहे.

प्रश्न. 4. शब्द हे संत तुकाराम महाराजांचे सर्वस्व आहे, या अर्थाची कवितेतील ओळ शोधा.

उत्तर :

शब्दचि आमुच्या जीवाचें जीवन |

प्रश्न. 5. तुमच्या शब्दांत उत्तरे लिहा.

अ) ‘शब्द वाटू धन जनलोकां’ या ओळीचा तुम्हांला समजलेला अर्थ स्पष्ट करा.

उत्तर :

तुकाराम महाराज म्हणतात आमच्याकडे लौकिक अर्थाने कुठलीही धनदौलत नाही. आमच्याकडे शब्दरूपी रत्नांचे धन आहे. शब्द हीच आमची संपत्ती आहे. हे शब्दांचे धन आम्ही जनमानसात वाटतो म्हणजे संत सामान्य लोकांना उपदेश करतात, लोकांची मने शब्दांची स्वच्छ करतात. त्यांच्या मनातील विकास नाहीसे करतात. ही सगळी शिकवण संत शब्दांनी देतात. म्हणून हे शब्दरूपी रत्नांचे धन आम्ही लोकांना वाटून टाकतो, दान करतो असे संत तुकाराम महाराज यांना म्हणायचे आहे.

आ) संत तुकाराम महाराज शब्दांचा गौरव का व कसा करतात ते तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.

उत्तर :

शब्दांची महती सांगताना संत तुकाराम महाराज शब्दांचा गौरव करतात, ते म्हणतात की, आमच्याकडे शब्दरूपी रत्नाचे धन आहे आणि षड्विकारांचा नाश करण्यासाठी आम्ही शब्दांचीच शस्त्रे केली आहेत. संतसज्जन जेव्हा जनसामान्यांना उपदेश करतात, तेव्हा जणू हे धनच लोकांना वाटतात. शब्द हे संतांच्या जीवनाचे सर्वस्व आहे. म्हणून शब्दांना ते देवत्व देतात. शब्द हाच आमचा देव असून त्याचा भक्तिभावाने सन्मान करणे हेच आमचे भाग्य आहे, असे तुकाराम महाराज म्हणतात.

इ) ‘शब्दांचे सामर्थ्य अफाट असते’ या विधानाबाबत तुमचा अनुभव लिहा.

उत्तर :

की कुणावर रागावलो की त्याला शिव्या देण्याची मला सवय होती. एकदा आजोबांनी मला बोलावलं न् म्हणाले, “तू मला शिव्या का देतोस?” “तुम्हाला? मी कधीच शिवी देत नाही.” “तू कुणालाही शिवी दे, ती मलाच लागते. त्यांच्या जागी आजोबा म्हणून मीच उभा असतो.” हे शब्द इतके परिणाम करून गेले की मी कुणावर रागावतो हे खरं पण शिवी कधीच देत नाही. ह्रदयपरिवर्तनाचे सामर्थ्य फक्त शब्दातच असते.

आ) संत सावता माळी

प्रश्न. 1. चौकटी पूर्ण करा.

अ) संत सावता महाराजांची मागणी –

उत्तर :

नेहमी संतांची आठवण राहावी व त्यांचीच संगत असावी

आ) संतांनी दाखवला तो मार्ग –

उत्तर :

भक्ती

प्रश्न. 2. सूचनेनुसार करा.

अ) अभंगात आलेला परमेश्वर या अर्थाचा दुसरा शब्द लिहा.

उत्तर :

नारायण

आ) ‘संत’ हे उत्तर येईल असा प्रश्न तयार करा.

उत्तर :

ज्ञानेश्वर, तुकाराम, नामदेव, रामदास हे कोण होते ?

इ) संत सावता महाराजांना कोणाची संगत हवी ? (एका वाक्यात उत्तर लिहा)

उत्तर :

संत सावता महाराजांना संतांची संगत हवी.

प्रश्न. 3. तुमच्या शब्दांत उत्तरे लिहा.

अ) संत सावता महाराजांचे मागणे तुमच्या शब्दांत लिहा.

उत्तर :

संत सावता माळी प्रस्तुत अभंगात परिमेश्वराकडे मागणे मागताना म्हणतात हे देवा, नारायण, आम्हांला कुणाकडेही काहीही मागायचे नाही. फक्त आम्हांला संतांची आठवण रहावी हीच खरी आमची मनोकामना आहे. संतसज्जन हेच आम्हांला भक्तीचा मार्ग दाखवतात. म्हणून आम्हांला सतत संतांची सोबत हवी. संतांचा कायम सहवास लाभावा म्हणून आम्हांला संतांची भेट घडवून दे. संत हेच आमच्यासाठी परमेश्वर आहेत.

आ) संत सावता महाराज संतांचा सहवास लाभण्याची मागणी का करतात ते स्पष्ट करा.

उत्तर :

कारण असे की संत हेच आम्हांला खरा भक्तिमार्ग दाखवतात ते पूर्ण भक्त आहेत. त्यांच्यासोबत आम्ही राहिलो, तर खरी भक्ती काय असते, हे आम्हांला कळेल. त्यासाठी संतांचा सहवास लाभण्याची मागणी संत सावता माळी देवापाशीं करतात.

इ) ‘सर्वत्र भक्त संतांना परमेश्वर रूप समजतात’ हा विचार अभंगाच्या आधारे पटवून द्या.

उत्तर :

संत सावता माळी यांच्या मते, संत हेच खरे पूर्ण भक्त असून ते भक्तांना भक्तिमार्ग दाखवतात. म्हणून ते संतांच्या सहवासाची याचना करतात, नलगे मुक्ती, धन, संपदा | संतसंग देई सदा || अशी विनवणी संत तुकाराम महाराजांनी आपल्या एका अभंगात केली आहे. कारण संत हे परमेश्वराचेच रूप आहे अशी सर्व भक्तांची धारणा आहे. संतरूपी या देवाचे दर्शन घडावे व त्यांची निरंतर सोबत मिळावी, ही मनोकामना या अभंगातून संत सावता माळी यांनी केली आहे.

Leave a Comment