गे मायभू स्वाध्याय
गे मायभू स्वाध्याय इयत्ता आठवी मराठी

प्रश्न. 1. एका वाक्यात उत्तरे लिहा.
अ) कवी कुणाचे पांग फेडू इच्छितो ?
उत्तर :
कवी मातृभूमीचे पांग फेडू इच्छितो.
आ) मातृभूमीची आरती करण्याची कवीची साधने कोणती ?
उत्तर :
सूर्य, चंद्र व तारे ही मातृभूमीची आरती करण्याची कवीची साधने आहेत.
इ) कवीच्या जन्माला कुणामुळे अर्थ प्राप्त झाला ?
उत्तर :
मातृभूमीमुळे कवीच्या जन्माला अर्थ प्राप्त झाला.
प्रश्न. 2. खालील काव्यपंक्तींचा तुम्हांला समजेलेला अर्थ स्पष्ट करा.
अ) आणीन आरतीला हे सूर्य, चंद्र, तारे –
उत्तर :
कवी सुरेश भट यांनी ‘गे मायभू’ या कवितेतून मातृभूमीच्या प्रेमविषयी आपल्या भावना प्रकट केल्या आहेत. मातृभूमीचे अनेक उपकार आपल्यावर आहेत. तिचे पांग फेडण्यासाठी तिची आरती कवी सुरेश भट यांना करावीशी वाटते. ज्याप्रमाणे आरती करताना तबकात निरांजन, हळद, कुंकू, अक्षता, फुले असतात. त्याप्रमाणे मातृभूमीची आरती करताना आरतीच्या तबकात सूर्य, चंद्र, तारे आणावेत असे कवीला वाटते. सूर्य, चंद्र, तारकांनी हे तबक सजवावेसे वाटते. तिच्यासाठी सूर्य, चंद्र, तारे या जगातील मौल्यवान गोष्टी आणाव्याशा वाटतात कारण तीही मौल्यवान आहे.
आ) आई, तुझ्यापुढे मी आहे अजून तान्हा –
उत्तर :
आपल्याला या पृथ्वीवर अस्तित्व देणारी भूमाता ही कवीला मोलाची वाटते. तिच्याप्रती कवी या कवितेतून कृतज्ञता व्यक्त करत आहे. ही मायभूमी, तिच्या उदरातून जन्माला आलेली म्हण रत्न, त्यांचे पराक्रम या भूमीवरील भारावून टाकणारा निसर्ग या सगळ्यामुळे कवीला आपण खूप तान्हं बाळं असल्यासारखे वाटते. या मातृभूमीच्या आधारानेच तर अनेक गोष्टी आपण साध्य करू शकतो. ती नेहमीच प्रेरणादायी ठरलेली आहे. ती माता आहे त्यामुळे आपण तिचे पुत्र आहोत. तिची वैभवशाली संपन्नता पाहता आपण अजून तान्हे आहोत असे कवीला वाटते.
प्रश्न. 3. हे केव्हा घडते ते लिहा.
अ) कवीची ललाटरेषा प्रयाग काशी बनते …………..
उत्तर :
जेव्हा कवी मस्तकावर मातृभूमीची पायधूळ लावतात, तेव्हा कवींची ललाटरेषा प्रयाग काशी बनते.
आ) कवी मातृभूमीची उत्तम गाणी गाऊ शकतो………….
उत्तर :
जेव्हा कवींची वाणी मातृभूमीरूपी आईच्या दुधाने भिजून जाते, तेव्हा कवी मातृभूमीची उत्तम गाणी गाऊ शकतात.
प्रश्न. 4. खालील अर्थाच्या कवितेतील ओळी शोधून लिहा.
अ) माझी भाषा मधूर आणि समृद्ध बनव.
उत्तर :
शब्दात सोड माझ्या आता हळूच पान्हा.
आ) शब्दसामर्थ्य, प्रतिभासामर्थ्य प्राप्त झाल्याने गाणे गाईन.
उत्तर :
आई, तुझी अशी मी गाईन रोज गाणी
प्रश्न. 5. कवितेत आलेले दोन वाक्प्रचार शोधा व त्यांचा वाक्यांत उपयोग करा.
उत्तर :
i) पांग फेडणे –
वाक्य – ज्या आईवडिलांनी आपले पालनपोषण केले, त्यांचे पांग फेडायलाच हवेत.
ii) पायधूळ घेणे –
वाक्य – परीक्षेला जाताना आपल्या आईची पायधूळ घ्यावी.
प्रश्न. 6. कवितेतील यमक जुळणारे शोधून लिहा.
उत्तर :
i) सारे – तारे
ii) तान्हा – पान्हा
iii) कशाला – आला
iv) जराशी – काशी
v) गाणी – वाणी
प्रश्न. 7. स्वमत
अ) कवीने पायधूळ कशाला म्हटले असावे, ते स्पष्ट करा.
उत्तर :
गे मायभू या कवितेमध्ये सुरेश भट यांनी मातृभूमीची थोरवी गायली आहे. ज्या भूमीवर आपला जन्म झाला त्या भारतदेशाचे गौरवगीत गायले आहे. कवींनी मातृभूमीला माता म्हटले आहे. मातेमुळे माझ्या शब्दांत सामर्थ्य आले आहे. त्या आईचा आशीर्वाद मिळणे हे आपले भाग्य आहे. तिची पायधूळ मस्तकावर मिरवावी असे कवींना वाटते. पायधूळ म्हणजे मातृभूमीचा चरणस्पर्श होय. तिच्या चरणांशी लीन होऊन, तिला वंदन करून आशीर्वाद घेण्याच्या प्रक्रियेला ‘पायाधूळ कपाळाला लावणे’ असे म्हटले आहे. कवींचा विनम्रभाव यातून प्रकट झाला आहे.
आ) ‘गे मायभू तुझे मी फेडीन पांग सारे’ या ओळीचा सरळ अर्थ लिहा.
उत्तर :
मातृभूमीचे गौरवगीत गे मायभू या कवितेमध्ये कवी सुरेश भट यांनी गायिले आहे. मातृभूमी ही माता आहे. मी तिचे तान्हे बाळ आहे. मातृभूमीने माझे लालन, पालन व पोषण केले आहे. तिच्या दुधाचे सामर्थ्य माझ्या शब्दांमध्ये आले आहे. अशा माऊलीचे उपकार हे जन्मोजन्मी फेडणे शक्य नाही. तरीही विनम्रभावाने कवी म्हणतात की तुझ्या आशीर्वादाने माझे नशीव उजळले आहे. म्हणून चंद्र-सूर्य व तारे आरतीला आणून मी कृतज्ञतापूर्वक तुझे पांग फेडणार आहे.
इ) कवितेतून व्यक्त झालेली मातृभूमीविषयीची भावना तुमच्या शब्दांत लिहा.
उत्तर :
आपल्या जीवनात मातृभूमीच्या आपल्या आई इतकेच अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. ‘गे मायभू’ या कवितेत कवींनी आपल्या मनात असलेला मातृभूमीविषयीचा नितांत आदर व्यक्त केला आहे. तिचे गौरवगीत गाताना कवी म्हणतात – हे मातृभूमी, तुझी मी आरती सूर्य, चंद्र व तारे घेऊन करतो आहे. तुझ्या चरणांशी लीन होऊन मला तुझे पांग फेडायचे आहेत. तू माझी माता आहेस, मी तुझे लहान मूल आहे. तुझ्यामुळे माझा जन्म सार्थकी लागला. तुझ्या दुधात माझी भाषा कालवून मी तुझी गौरवगीते गाणार आहे.