बाकी वीस रुपयांचं काय स्वाध्याय

बाकी वीस रुपयांचं काय स्वाध्याय

बाकी वीस रुपयांचं काय स्वाध्याय इयत्ता सहावी मराठी

प्रश्न. 1. तीन-चार वाक्यांत उत्तरे लिहा.

अ) साहेबांनी विकासकडे राजूबाबत कोणती तक्रार केली ?

उत्तर :

विकास सर, कालच्या त्या मुलानं मला ऐंशी रुपयांनी फसवलं. शंभराची नोट घेऊन गेला. एकदा गेला तो गेलाच. त्याची पाण्याची बाटली मला शंभर रुपयात पडली. हे सारं तुमच्यामुळं घडलं. साहेबांनी विकासकडे राजूबाबत अशी तक्रार केली.

आ) दवाखान्यात राजूला पाहून विकासची उत्सुकता का वाढली ?

उत्तर :

राजूच्या गळ्यात एक पाटी अडकवलेली होती. त्यावर त्याने ‘उरलेले अन्न’ देण्याचे आवाहन केले होते. त्याच्या हातात एक पिशवी होती. ती पाहून त्यात काही अन्न असावे असे वाटत होते. म्हणून दवाखान्यात राजूला पाहून विकासची उत्सुकता वाढली.

इ) दवाखान्यमध्ये फिरताना राजूच्या काय लक्षात आले ?

उत्तर :

दवाखान्यामध्ये फिरताना राजूच्या लक्षात आले, की पेशंटसोबत आलेले अनेक गोरगरीब भुकेने व्याकूळ असतात. ते इथे पैशासाठी, अन्नासाठी दुसऱ्यासमोर हात पसरतात. आणि दुसरीकडे मात्र बरेच लोक जेवून शिल्लक राहिलेले अन्न कचराकुंडीत फेकून देता.

ई) भुकेलेल्यांसाठी राजूने कोणता उपक्रम सुरू केला ?

उत्तर :

राजूने एक पुठ्ठा घेतला. त्यावर लिहिले, ‘उरलेलं अन्न फेकू नका, मले द्या. मी ते उपाशी लोकायले देतो’. राजूने पुठ्ठाला दोरी बांधून ती गळ्यात अडकवली. राजूच्या गळ्यातली पाटी वाचून लोक राहिलेले अन्न त्याला देऊ लागले. ते जमा झालेले अन्न तो गरजूंना द्यायचा. भुकेलेल्यांसाठी राजूने हा उपक्रम सुरू केला.

उ) साहेबांचा राजूबद्दलचा गैरसमज कसा दूर झाला ?

उत्तर :

एक मुलगा साहेबांच्या कार्यालयात आला. परवानगी मानून आत शिरला आणि म्हणाला, ‘सर, मी इरफान. राजूचा मित्र. ही शंभरची नोट त्यानं मला तुम्हाला द्यायला सांगितली आहे. कारण तो गावाला गेला आहे.’ इरफानने ती नोट साहेबांना दिली. यामुळे साहेबांचा राजूबद्दलचा गैरसमज दूर झाला.

प्रश्न. 2. तुमच्या मनाने उत्तरे लिहा.

अ) ‘कोणाच्या वस्तूला हात लावू नको,’ असे आईने राजूला का सांगितले असेल ?

उत्तर :

कोणाच्या वस्तूला हात लावण्याने ती वस्तू आपल्याजवळ ठेवायची इच्छा निर्माण होते. त्यातून चोरीची वृत्ती निर्माण होते. म्हणून ‘कोणाच्या वस्तूला हात लावू नको’ असे राजूच्या आईने सांगितले असेल.

आ) ‘माणसे ओळखण्यातला तुमचा अधिकार मोठा आहे’, असे साहेब विकासला का म्हणाले असतील ?

उत्तर :

विकासने राजूवर विश्वास ठेवला होता. उलट, ही गरीब दिसणारी मुलं महाबिलंदर असतात असे साहेबाला वाटत होते. राजूने पैसे परत केले नाहीत यावरून आपण माणसं बरोबर ओळखतो असे त्यांना वाटले. पण इरफानच्या हातून राजूने पैसे परत पाठवले तेव्हा विकासने राजूवर विश्वास ठेवला हेच योग्य होते व आपलेच चुकले असे त्यांना वाटले. म्हणून ‘माणसं ओळखण्यातला तुमचा अधिकार मोठा आहे.’ असे ते विकासला म्हणाले असतील.

इ) भुकेलेल्या लोकांना अन्न मिळावे, म्हणून आणखी काय काय करता येईल ?

उत्तर :

भुकेलेल्या लोकांना अन्न मिळावे म्हणून एके ‘अन्न-समिती’ निर्माण करता येईल. त्यातील काही सदस्य लग्नसमारंभात जातील. जेवणे उरकल्यावर ते अन्न मिळवता येईल. वाढदिवसांना किंवा महाप्रसादाला जाऊनही हे कार्य करता येईल.

ई) तुम्हांला राजूशी मैत्री करायला आवडेल का ? का ते सांगा.

उत्तर :

मला रजुशी मैत्री करायला आवडेल कारण मलाही त्याच्यासारखे काहीतरी करावेसे वाटते. पण लोक काय म्हणतील याची भीती वाटते. त्याच्या मैत्रीमुळे मला ही भीती वाटणार नाही आणि काहीतरी करता येईल.

उ) राहिलेल्या वीस रुपयांचे विकासच्या साहेबांनी काय करावे असे तुम्हांला वाटते ?

उत्तर :

राजू जसा प्रमाणिक तसाच इरफानही प्रमाणिक आहे. त्याने मधल्यामध्ये पैसे हडप केले नाही. यामुळे त्याच्या प्रामाणिकपणाचे बक्षीस म्हणून विकासच्या साहेबांनी राहिलेले वीस रुपये इरफानला बक्षीस द्यावे असे मला वाटते.

ऊ) राजूचा प्रामाणिकपणा पाठातील कोणकोणत्या प्रसंगांतून दिसून येतो ?

उत्तर :

दवाखान्यातील पेशंटच्या नातेवाईकांना बाहेरून काही आणून द्यायचे असेल, तर राजू पळत जाऊन आणून द्यायचा. एखाद्या पेशंटचा जवळचा नातेवाईक कुठे बाहेर जाणार असला, तर तो ‘राजू ध्यान दे माझ्या पेशंटकडे, मी जरा जाऊन येतो’ म्हणून बिनधास्त निघून जायचा. राजूने विकासच्या साहेबांचे पैसे प्रमाणिकपणे परत केले. या सर्व प्रसंगांतून राजूचा प्रामाणिकपणा दिसून येतो.

प्रश्न. 3. तुम्हांला राजूची आई भेटल्यास तुम्ही राजूबद्दल तिच्याजवळ काय बोलाल ते लिहा.

उत्तर :

आम्हांला राजूची आई भेटली तर आम्ही तिला सांगू की राजू खूप छान मुलगा आहे. आम्हाला तो खूप आवडतो. आपल्या प्रेमळ आणि सहृदय स्वभावामुळे तो आम्हा सर्वाचा लाडका बनला आहे. आम्हाला त्याचा अभिमान वाटतो. दवाखान्यातले सर्व लोक त्याचे भारी कौतुक करतात. तो आमचा खरा मित्र आहे.

प्रश्न. 4. एखाद्या गरजू विद्यार्थ्याला तुम्ही कशाप्रकारे मदत कराल ?

उत्तर :

एखाद्या गरजू विद्यार्थ्याला आम्ही आलटून पालटून पुस्तके पुरवू. म्हणजे आम्ही इतिहासाचे पुस्तक वाचायचे ठरवल्यास त्याला भूगोलाचे पुस्तक वाचायला देऊ. आम्ही गणिते सोडवत असताना त्याला इंग्रजीचे किंवा विज्ञानाचे पुस्तक देऊ. त्याला पेनसुद्धा देता येईल आणि आईच्या परवानगीने त्याला आठवड्यातून एक दिवस जेवायलाही बोलवता येईल. गरजू विद्यार्थ्याला आम्ही अशा प्रकारे मदत करू.

प्रश्न. 5. पाठात तुम्हांला राजूचे कोणते गुण दिसले ते खालील चौकटीत लिहा. त्या शब्दांचा वापर करून राजूविषयी आठ-दहा ओळींत माहिती लिहा.

उत्तर :

राजू आज्ञाधारक होता. आईने सांगितल्याप्रमाणे तो दवाखान्यात तिथल्या तिथेच फिरायचा. राजू सहृदय होता. दवाखान्यात पेशंटसोबत आलेले अनेक लोक भुकेलेले आहेत असे पाहून त्याच्या मनात करुणा निर्माण झाली. तो विश्वासू होता. पेशंटच्या नातेवाइकांना बाहेरून काही आणायचे असेल तर ते आणायला राजूला सांगत असत. राजू कष्टाळू होता. कोणाचेही काम करायचा तो कंटाळा करीत नसे. राजू कल्पक होता. भुकेलेल्यांना अन्न कसे मिळेल याचा विचार करून, ‘उरलेले अन्न फेकू नका, मले द्या’. अशी पाटी गळ्यात अडकवली व अन्न मिळवले. राजू प्रामाणिक होता. तो गावाला गेला तरी त्याने आपल्या मित्राच्या हातून साहेबांचे पैसे परत पाठवले .

खेळूया शब्दांशी

1) फसवाफसवी, कचराकुंडी, गोरगरीब यांसारखे तुम्हांला माहीत असलेले जोडशब्द लिहा.

उत्तर :

केरकचरा, बनवाबनवी, चोरचिलटे, गरीबगुरीब, गरमागरमी

2) खालील शब्दांसाठी मराठी शब्द लिहा.

अ) फाइल

उत्तर :

फाइल – मिसल

आ) सेंटर

उत्तर :

सेंटर – केंद्र

इ) पेशंट

उत्तर :

पेशंट – रुग्ण

ई) विंग

उत्तर :

विंग – दालन

उ) हॉटेल

उत्तर :

हॉटेल – उपाहारगृह

ऊ) कॅन्सर

उत्तर :

कॅन्सर – कर्करोग

3) पाठात आलेल्या पुढील शब्दांचा वाक्यांत उपयोग करा.

अ) महाबिलंदर

उत्तर :

आजकालचे बिल्डर महाबिलंदर असतात.

आ) आवाहन

उत्तर :

पंतप्रधानांनी स्वच्छतेचे आवाहन केले.

इ) अनुभवशून्य

उत्तर :

बालक अनुभवशून्य असते.

ई) निरुत्तर

उत्तर :

निर्दोष माणसालाही निरुत्तर करण्यात वकील पटाईत असतात.

4) ‘भारी कौतुक’ म्हणजे ‘खूप कौतुक’, ‘भारी’ हा शब्द तुम्ही केव्हा केव्हा वापरता ? हा शब्द वापरुन तीन-चार वाक्ये लिहा.

उत्तर :

i) आईने रमेशचे भारी लाड केले.

ii) त्रिविधा भारी खट्याळ आहे.

iii) लहानगा अनुज भारी खोडकर आहे.

iv) मला बेइमान मित्रांचा भारी राग येतो.

‘पैसा’ या शब्दाचे सामान्यरूप समजून घ्या. उदा. पैसा-पैशाला, पैशाने, पैशांसाठी, पैशांचा, पैशांहून, पैशातला. याप्रमाणे खालील शब्दांची सामान्यरुपे लिहा.

अ) मासा –

उत्तर :

माशाला, माशाने, माशांसाठी, माशांचा, माशांहून, माशातला

आ) ससा

उत्तर :

सशाला, सशाने, सशांसाठी, सशांचा, सशांहून, सशातला

इ) ठसा

उत्तर :

ठशाला, ठशाने, ठशांसाठी, ठशांहून, ठशातला

खालील शब्दांना की, ई, ता, वा, पणा, आई हे प्रत्यय लावून भाववाचक नामे तयार करा.

अ) सुंदर

उत्तर :

सुंदरता

आ) प्रामाणिक

उत्तर :

प्रामाणिकपणा

इ) नवल

उत्तर :

नवलाई

ई) गोड

उत्तर :

गोडवा

उ) दांडगा

उत्तर :

दांडगाई

ऊ) शांत

उत्तर :

शांती

ए) पाटील

उत्तर :

पाटीलकी

ऐ) चपळ

उत्तर :

चपळाई

खालील भाववाचक नामांचे विरुद्धार्थी शब्द लिहा.

अ) मित्रत्व X

उत्तर :

मित्रत्व X शत्रुत्व

आ) गरिबी X

उत्तर :

गरिबी X श्रीमंती

इ) खरेपणा X

उत्तर :

खरेपणा X खोटेपणा

ई) महागाई X

उत्तर :

महागाई X स्वस्ताई

खाली दिलेल्या शब्दांसारखे अन्य शब्द लिहा.

अ) मनुष्यत्व –

उत्तर :

मनुष्यत्व – माणुसकी

आ) आपुलकी –

उत्तर :

आपुलकी – आपलेपणा

इ) नम्रता –

उत्तर :

नम्रता – नम्रपणा

ई) नवलाई –

उत्तर :

नवलाई – नवल

उ) बालपण –

उत्तर :

बालपण – बाल्य

ऊ) माधुर्य –

उत्तर :

माधुर्य – मधुरता

आपण समजून घेऊया

खाली दिलेल्या वाक्यांत अधोरेखित नामांच्या जागेवर योग्य सर्वनामे लिहा व वाचा.

समीरा गुणी मुलगी आहे. समीरा नेहमी हसतमुख असते. समीराला गोष्टी सांगायला आवडतात. समीराच्या गोष्टी सगळे मन लावून ऐकतात. समीराने खो-खो खेळात बक्षीस मिळवले आहे.

उत्तर :

समीरा गुणी मुलगी आहे. ती नेहमी हसतमुख असते. तिला गोष्टी सांगायला आवडतात. तिच्या गोष्टी सगळे मन लावून ऐकतात. तिने खो-खो खेळात बक्षीस मिळवले आहे.

खालील उतारा काळजी पूर्वक वाचून आशयानुसार दोन परिच्छेद करा. उताऱ्याला योग्य शीर्षक द्या.

समजा दमयंती जेवत असेल अन् तिला कोणातरी म्हणाले, ‘खेळायला येतेस का ?’ तर दमयंती जेवण अर्धवट सोडून खेळायला पळेल. एवढा खेळ तिला जीव की प्राण. मग तो कोणताही खेळ असो, मैदानी असो वा बैठा खेळ असो. दमयंती त्यात तल्लीन होऊन जाते. असा एकही खेळ नाही जो तिला आवडत नाही. बैठ्या खेळात ती जेवढी तरबेज तेवढीच मैदानी खेळातही. सागरगोटे, चल्लसआठ, काचापाणी, पत्त्यातील सावकार-भिकार अशा खेळांत जिंकणे म्हणजे तिच्या डाव्या हातचा मळ. मैदानी खेळ खेळताना कधी कधी ती एवढी हमरीतुमरीवर येते, की जणू आता तिने पुढच्या खेळाडूबरोबर कडाक्याचे भांडण होईल; पण एकदा का खेळ संपला, की प्रतिस्पर्ध्याच्या हातात हात घालून चाललेली दिसणार हे नक्की. दमयंती म्हणते, “खेळामुळे शरीराचा व्यायाम होतो. मन ताजेतवाने होते. हाता-पायांचे स्नायू बळकट होतात. ह्रदय व फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढते. आपल्याला दिवसभराच्या कामाने आलेला थकवा, मरगळ जाऊन आपल्यात नवा जोश, उत्साह निर्माण होतो. कबड्डी, खो-खो, लंगडी, डॉजबॉल यांसारख्या मैदानी खेळांमुळे स्वत:वर येणाऱ्या संकटांशी सामना करण्याची ताकद आपल्यांत निर्माण होते.” प्रत्येकाने रोज थोडे का होईना पण खेळलेच पाहिजे. तुम्हांला निरोगी राहायचे असेल, तर योग्य आहाराबरोबर योग्य व्यायाम असायला हवा अन् खेळांतून शरीर व मनाला मिळणारा व्यायाम सर्वागसुंदर व्यायाम असतो, नाही का ?

उत्तर :

दमयंतीचे खेळणे – समजा दमयंती जेवत असेल अन् तिला कोणातरी म्हणाले, ‘खेळायला येतेस का ?’ तर दमयंती जेवण अर्धवट सोडून खेळायला पळेल. एवढा खेळ तिला जीव की प्राण. मग तो कोणताही खेळ असो, मैदानी असो वा बैठा खेळ असो. दमयंती त्यात तल्लीन होऊन जाते. असा एकही खेळ नाही जो तिला आवडत नाही. बैठ्या खेळात ती जेवढी तरबेज तेवढीच मैदानी खेळातही. सागरगोटे, चल्लसआठ, काचापाणी, पत्त्यातील सावकार-भिकार अशा खेळांत जिंकणे म्हणजे तिच्या डाव्या हातचा मळ. मैदानी खेळ खेळताना कधी कधी ती एवढी हमरीतुमरीवर येते, की जणू आता तिने पुढच्या खेळाडूबरोबर कडाक्याचे भांडण होईल; पण एकदा का खेळ संपला, की प्रतिस्पर्ध्याच्या हातात हात घालून चाललेली दिसणार हे नक्की.

व्यायामाचे महत्त्व – दमयंती म्हणते, “खेळामुळे शरीराचा व्यायाम होतो. मन ताजेतवाने होते. हाता-पायांचे स्नायू बळकट होतात. ह्रदय व फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढते. आपल्याला दिवसभराच्या कामाने आलेला थकवा, मरगळ जाऊन आपल्यात नवा जोश, उत्साह निर्माण होतो. कबड्डी, खो-खो, लंगडी, डॉजबॉल यांसारख्या मैदानी खेळांमुळे स्वत:वर येणाऱ्या संकटांशी सामना करण्याची ताकद आपल्यांत निर्माण होते.” प्रत्येकाने रोज थोडे का होईना पण खेळलेच पाहिजे. तुम्हांला निरोगी राहायचे असेल, तर योग्य आहाराबरोबर योग्य व्यायाम असायला हवा अन् खेळांतून शरीर व मनाला मिळणारा व्यायाम सर्वागसुंदर व्यायाम असतो, नाही का ?

ओळखा पाहू !

मागे आणि पुढे दोन तोंडे असतात मला,

जमीन भुसभुशीत करण्याची माझी कला,

शेतकऱ्याला मित्र म्हणून ओळखतात मला.

ओळखा कोण ?

उत्तर :

नांगर

पहाट होताच तुम्हांला दिसतो,

तेव्हाच दिवस सुरू होतो,

लवकर उठून पाहायचा,

तुम्ही निश्चय करा,

आहे सर्वात मी, तेजस्वी तारा.

ओळखा कोण ?

उत्तर :

सूर्य

2 thoughts on “बाकी वीस रुपयांचं काय स्वाध्याय”

Leave a Comment