माय स्वाध्याय

माय स्वाध्याय

माय स्वाध्याय इयत्ता सहावी मराठी

प्रश्न. 1. चार-पाच वाक्यांत उत्तरे लिहा.

अ) कवितेतील कष्टकरी आईची अवस्था कशी आहे ?

उत्तर :

कवितेतील कष्टकरी आई फनकाट्या वेचायला रानात जाते. त्यावेळी तिच्या पायात वहणही नसते. अनवाणी पायानेच ती रानात हिंडत असते. तिचा पाय विंचू व काट्यालाही मोजत नाही, जुमानत नाही. कवितेतील कष्टकरी आईची अवस्था अशी आहे.

आ) कवी सुट्टीत घरी आल्यावर आई त्याच्यासाठी काय करत असे ?

उत्तर :

कवी सुट्टीत घरी आल्यावर आई उसनंपासनं आणून कवीला नानापरीचे पदार्थ करून खाऊ घालत असे. ती त्याला म्हणत असे की पोटभर खा. खाताना घाई करू नकोस. कवी सुट्टीत घरी आल्यावर आई हे सर्व करीत असे.

इ) कवीच्या आईचे डोळे का भरून येतात ?

उत्तर :

कवीच्या वडिलांना वाटत असते की, कवीने आता शिक्षण सोडून द्यावे आणि शेतकामाला लागावे. तेव्हा त्यांना कवीची आई म्हणते की, असे भलतेसलते सांगून त्याचे कान भरू नका. तुम्हाला माझ्या गळ्याची शपथ आहे. असे बोलता बोलता कवीच्या आईचे डोळे भरून येतात.

ई) आईच्या पोटी पुन्हा जन्म घ्यावा, असे कवीला का वाटते ?

उत्तर :

आई कवीला म्हणते की, तुझे लग्न कधी होते आणि कधी एकदा मी तुझ्या राणीला पाहते असे मला झाले आहे. तुमच्या दुधावरची साय पाहायला म्हणजे तुमच्या बाळाला माझ्या डोळ्यांनी पाहायला माझे मन आतूर झाले आहे. हे बोलतांना तिच्या डोळ्यात पाणी आले. आईच्या अशा उत्कट आणि आत्यंतिक प्रेमाचा कवीला अनुभव आला. म्हणून आईच्या पोटी पुन्हा जन्म घ्यावा, असे कवीला वाटते.

उ) आईसाठी कवीला काय करावेसे वाटते ?

उत्तर :

आईची सुखानं ओटी भरावी. तिच्या पोटी पुन्हा एकदा जन्म घ्यावा. आणि तिचे पाय घट्ट धरून ठेवावे. हे सर्व आईसाठी कवीला करावेसे वाटते.

प्रश्न. 2. कोण, कोणास व का म्हणाले ?

अ) करू नको घाई म्हणे पोटभर खाय.

उत्तर :

आई कवीला म्हणाली

कारण गावावरून आलेल्या मुलाने चांगले पोटभर जेवावे म्हणून ती उसनेपासने आणून नानापरी जेवण तयार करीत असे.

आ) बस झालं शिक्शन याचं घेऊ दे हाती रुमनं

उत्तर :

कवीचे वडील कवीच्या आईला म्हणाले.

कारण शिक्षण घेऊनही आपला मुलगा मोठा साहेब होणार नाही, असे त्यांना वाटत होते.

इ) या डोयानं पाहीन रे मी दुधावरची साय.

उत्तर :

आई कवीला म्हणाली.

कारण कवीचे लग्न व्हावे आणि त्याचे मूल आपण आपल्या डोळ्यांनी पाहावे, अशी तिची इच्छा होती .

ई) अन् ठेवावे माय घट्ट धरून तुहे पाय.

उत्तर :

कवी स्वतःशीच म्हणाला

कारण त्याला आईच्या आपल्यावरील आत्यंतिक प्रेमाची प्रचीती आली होती.

प्रश्न. 3. कविता वाचताना तुम्हांला कोणकोणते प्रसंग अस्वस्थ करतात ते लिहा.

उत्तर :

आई रानातल्या फनकाट्या वेचायला रानावनात अनवाणी जाते, गावावरून आलेल्या कवीला उसनंपासनं आणून नानापरी जेवण तयार करून त्याला पोटभर खाण्याचा आग्रह करते. त्याने शिक्षण सोडावे व शेतकामावर जावे असा त्यांच्या वडिलांचा विचार ऐकताच तिच्या डोळ्यात पाणी येते. कवीचे लग्न व्हावे आणि त्याचे मूल आपल्या डोळ्यांनी पाहावे अशी आपली इच्छा ती कवीजवळ बोलून दाखवते. कविता वाचताना आम्हाला हे प्रसंग अस्वस्थ करतात.

प्रश्न. 4. या कवितेचे स्वतःच्या शब्दात रुपांतर करून कथा लिहा. तुमच्या कथेला योग्य शीर्षक द्या.

उत्तर :

आई, तुझ्याच पोटी मी पुन्हा जन्म घ्यावा !

जेव्हा गाय हंबरते आणि वासराला वाटते तेव्हा मला तिच्यात माझी आई दिसते. फनकाटे वेचायला माझी आई रानावनात जाते. तेव्हा तिच्या पायात साध्या वहणाही नसतात. अनवाणी पायानेच ती रानात हिंडते. तिचे पाय काट्या कुट्यांनाही जुमानत नाही.

मी शिक्षणासाठी परगावी असतो. सुट्टीत जेव्हा मी घरी येतो तेव्हा आईला एवढा आनंद होतो की, ती शेजारपाजाऱ्यांजवळून उसने आणून माझ्यासाठी नानाप्रकारचे जेवण तयार करते. मी ते पोटभर खावे म्हणून आग्रह करते आणि म्हणते, ‘घाई करू नकोस. अगदी पोटभर खा.’

माझे वडील माझ्या आईच्या मागे सारखे टुमणे लावत असतात की, आता त्याचे शिक्षण घेणे पुरे झाले. त्याला आता शेतीच्या कामावर पाठवायला हवे. तो काही शिकल्यामुळे मोठा साहेब होणार नाही आहे. हे ऐकून आई अस्वस्थ होते.

ती वडिलांना म्हणते, ‘असे भलतेसलते बोलून त्याचे कान भरू नका. तुम्हांला माझ्या गळ्याची शपथ आहे.’ हे बोलताना तिच्या डोळ्यात अश्रू दाटून आले असतात.

ती माझ्याशी बोलता बोलता एक दिवस तिच्या डोळ्यात पाणी आलं. ती म्हणाली, ‘मला तुझं लग्न झालेलं पाहायचं आहे. तुझ्या राणीला बघायचं आहे. आणि तुझ्या दुधावरची साय म्हणजे तुला झालेलं मूल माझ्या डोळ्यांदेखत मला बघायचं आहे.’

आई ? तुझ्या या शब्दांशी मी भारावून गेलो. असं वाटते की तुझी ओटी आनंदाचं भरावी आणि मी पुन्हा एकदा तुझ्याच पोटी पूनर्जन्म घ्यावा. तुझे पाय घट्ट धरून ठेवावे.

प्रश्न. 5. ‘माझी आई’ या विषयावर दहा ते पंधरा ओळी लिहा.

उत्तर :

माझी आई

माझी आई प्रेमस्वरूप, वात्सल्यसिंधू आणि संस्कारांची पाठशाळा आहे. माझी आई अजूनही पहाटेला उठते. अंगणात सुरेख रांगोळी काढते. तिच्या रांगोळीमुळे मला चित्रकलेची आवड निर्माण झाली आहे. आम्ही गरीब आहोत. मीठभाकर गोड करून खात असतो. जेवताना हे चांगले न ते वाईट असे बोलायची आम्हांला मुभा नाही. अन्न म्हणजे परब्रह्म हे आईने आमच्या पचनी पाडले आहे.

मी शिस्तप्रिय म्हणून सगळेजण माझा गौरव करतात. पण ही शिस्त माझ्यात आली कुठून ? लहानपणी मी आईच्या हातचे चांगले धपाटे खाल्ले, त्यातून मला ही शिस्त लागली. आम्हा मुलांच्या वागणुकीवर आणि अभ्यासावर तिची करडी नजर असते.

तिच्या आमच्यावर असा दरारा असला तरी माझी आई प्रेमळपणाची आणि वात्सल्याची प्रत्यक्ष मूर्ती आहे. लहानपणी मी आजारी पडलो होतो. इतका की डॉक्टरांनीही आशा सोडून दिली होती. आई रात्रभर माझ्या उशाशी बसून राहायची, मला धीर द्यायची, देवाची प्रार्थना करायची, दिवसरात्र माझी शुश्रुषा करायची.

अशी आहे माझी आहे. मी पुन्हा पुन्हा म्हणत असतो. ‘आई थोर तुझे उपकार.’

प्रश्न. 6. खालील शब्द पाहा.

वहाण – चपला, वाहन – प्रवासाचे साधन

उच्चारात बरेच साम्य असलेले; पण अर्थ भिन्न असलेले असे शब्द माहीत करून घ्या. लिहा. त्यांचे अर्थ समजून घ्या.

उत्तर :

करता-करताना कर्ता-करणारा

कमल-एक फूल कमाल-सर्वाधिक

उपहार-भेट वस्तू उपाहार-फराळ

अंबा-देवी आंबा-एक फळ

उपस-वर काढणे उपास-न जेवणे

खेळूया शब्दांशी

अ) खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा.

उत्तर :

आ) खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा.

उत्तर :

इ) गळ्याची आण घालणे, कान भरणे हे वाक्प्रचार या कवितेत आलेले आहेत. गळा व कान या अवयवांवरील वाक्प्रचार माहीत करून घ्या व त्यांची यादी तयार करा.

उत्तर :

गळा कान
गळा धरणे
गळा काढणे
गळा कापणे
गळा ताटणे
गळा भरून येणे
गळी उतरणे
गळी पडणे
गळ्यात पडणे
गळ्यात बांधणे
गळ्यापर्यंत येणे
गळ्याला फास लागणे
गळ्याला नख लावणे
गळ्याशी येणे
गळ्यातला ताईत
कान उपटणे
कान पिळणे
कान सोनाराने टोचणे
कान देणे
कान धरणे
कान भरणे
कानाला खडा लावणे
कानात तुळशीपात्र घालणे
कान विटणे
कान फूंकणे
कानावर हात ठेवणे
कानटाळी बसणे
कानापाठीमागे टाकणे
कानमंत्र देणे

खालील वाक्यांतील सर्वनामांना अधोरेखित करा.

1. राधा म्हणाली, ‘प्रशांत, तू किती छान गाणे गातोस.’

उत्तर :

राधा म्हणाली, ‘प्रशांत, तू किती छान गाणे गातोस.’

2. ती माझी बहीण आहे.

उत्तर :

ती माझी बहीण आहे.

3. कोणी कोणाशी भांडू नये.

उत्तर :

कोणी कोणाशी भांडू नये.

4. ज्याला बाहेर फिरायला जायचे आहे, त्याला मी घेऊन जाईन.

उत्तर :

ज्याला बाहेर फिरायला जायचे आहे, त्याला मी घेऊन जाईन.

5. मला कोणी काही विचारू नये.

उत्तर :

मला कोणी काही विचारू नये.

6. सदा माधवच्या बाबांना म्हणाला, ‘हा मला त्रास देतो, त्याला मी समजावून सांगितले; पण तो त्याचेच म्हणणे खरे करतो.’

उत्तर :

सदा माधवच्या बाबांना म्हणाला, ‘हा मला त्रास देतो, त्याला मी समजावून सांगितले; पण तो त्याचेच म्हणणे खरे करतो.’

गाळलेल्या जागी कंसातील योग्य सर्वनाम लिहा.

1. ……………….. वह्या मुलांना द्या. (हा, ही, ह्या)

उत्तर :

ह्या वह्या मुलांना द्या.

2. त्याला ……………….. आवडते ? (काय, कोणते, कोणी)

उत्तर :

त्याला काय आवडते ?

3. ……………….. आकाशकंदील बनवले. (तू, आम्ही, कोणी)

उत्तर :

आम्ही आकाशकंदील बनवले.

4. मी ………………. स्वयंपाकघर स्वच्छ केले. (आपण, स्वत:, त्याने)

उत्तर :

मी स्वत: स्वयंपाकघर स्वच्छ केले.

5. त्याने ……………….. काही सांगितले नाही. (कोणाला, कोणी, काय)

उत्तर :

त्याने कोणाला काही सांगितले नाही.

खालील चित्र पाहून रिकाम्या जागी योग्य पुरुषवाचक सर्वनाम लिहा.

1. ………………… आज पतंग उडवणार आहे.

उत्तर :

तो आज पतंग उडवणार आहे.

2. ……………… पतंग छान उडवते.

उत्तर :

ती पतंग छान उडवते.

3. मैदानावर ……………….. पतंग घेऊन गेलो.

उत्तर :

मैदानावर मी पतंग घेऊन गेलो.

4. ……………….. पतंग उडवूया.

उत्तर :

आपण पतंग उडवूया.

5. पतंग उडवण्यात …………………. तरबेज आहेत.

उत्तर :

पतंग उडवण्यात ते तरबेज आहेत.

खाली दिलेल्या सर्वनामांचा उपयोग करून वाक्ये लिहा.

1. कोण –

उत्तर :

कोण हवंय तुला ?

2. हे –

उत्तर :

हे काय आहे ?

3. ती –

उत्तर :

ती गाणे छान गाते.

4. काय –

उत्तर :

पिशवीत काय आहे. ?

5. कोणाचा –

उत्तर :

कोणाचा मत्सर करणे चांगले नाही.

6. ही –

उत्तर :

ही ऑफिसमध्ये काम करते.

Leave a Comment