पदार्थ सभोवतालचे अवस्था आणि गुणधर्म स्वाध्याय

पदार्थ सभोवतालचे अवस्था आणि गुणधर्म स्वाध्याय

पदार्थ सभोवतालचे अवस्था आणि गुणधर्म स्वाध्याय इयत्ता सहावी सामान्य विज्ञान

१. खालील परिच्छेदाचे काळजीपूर्वक वाचन करा. त्यात ज्या पदार्थाचा उल्लेख आलेला आहे कंसात त्यांच्या पुढे स्थायू, द्रव, वायू यांपैकी योग्य पर्याय लिहा.

सूर्यप्रकाश असलेल्या दिवशी पार्कमध्ये रिया आणि गार्गी चेंडू ( ) बरोबर खेळत आहेत. गार्गीला तहान लागली म्हणून रियाने तिच्यासाठी नारळपाणी ( ) आणले. तेवढ्यात वारा ( ) वाहू लागला आणि पाऊस ( ) देखील पडू लागला. त्या पटकन घरात ( ) आल्या. आपले कपडे ( ) बदलते आणि आईने त्यांना एक-एक कप ( ) गरम दूध ( ) प्यायला दिले.

उत्तर :

सूर्यप्रकाश असलेल्या दिवशी पार्कमध्ये रिया आणि गार्गी चेंडू ( स्थायू ) बरोबर खेळत आहेत. गार्गीला तहान लागली म्हणून रियाने तिच्यासाठी नारळपाणी ( द्रव ) आणले. तेवढ्यात वारा ( वायू ) वाहू लागला आणि पाऊस ( द्रव ) देखील पडू लागला. त्या पटकन घरात ( स्थायू ) आल्या. आपले कपडे ( स्थायू ) बदलते आणि आईने त्यांना एक-एक कप ( स्थायू ) गरम दूध ( द्रव ) प्यायला दिले.

२. चर्चा करा.

अ. रिया तिच्याजवळ असलेल्या पाण्याच्या बाटलीतून थोडे पाणी दुसऱ्या बाटलीमध्ये ओतते. त्यामुळे पाण्याच्या आकारात काही बदल होईल का ?

उत्तर :

होय. मूळ पाण्याच्या बाटलीतील पाणी कमी होईल ?

आ. हलीमा एक लहान वाळूचा खडा जमिनीवरून उचलून पाण्याने भरलेल्या डिशमध्ये टाकते, तर त्या खड्याचा आकार बदलेल का ?

उत्तर :

नाही. कारण वाळूचा खडा अविद्राव्य आहे.

३. पुढील पदार्थाचे गुणधर्म नमूद करा.

(पाणी, काच, खडू, लोखंडी गोळा, साखर, मीठ, पीठ, कोळसा, माती, पेन, शाई, साबण)

उत्तर :

१) पाणी – i) पाणी हा द्रव पदार्थ आहे.

ii) पाण्याने घनरूपात बर्फ व वायू रूपात बाष्प बनते.

iii) शुद्ध पाणी रंगहीन व गंधहीन असते.

iv) पाण्यात बरेच पदार्थ विद्राव्य असल्यामुळे पाण्याला ‘वैश्विक द्रावक’ असे म्हणतात.

२) काच – i) काच ही वाळू वितळून तयार केली जाते.

ii) काचेवर दाब दिला असता त्याचे बारीक बारीक कणांत रूपांतर होते. म्हणून ठिसूळपणा हा काचेचा महत्त्वाचा गुणधर्म आहे.

३) खडू – i) खडू हा घन पदार्थ आहे.

ii) खडूबर दाब दिला असता त्याचे बारीक बारीक तुकडे होत असल्यामुळे ठिसूळपणा हा त्याचा महत्त्वाचा गुणधर्म आहे.

iii) खडू पाण्यात अविद्राव्य आहे.

४) लोखंडी गोळा – i) लोखंडी गोळा हा स्थायू धातू आहे.

ii) त्याला ठोकून त्यापासून तार, पत्रे तसेच अवजारे बनविल्या जाते. म्हणून लोखंडात वर्धनीयता व तन्यता हे गुणधर्म आहेत.

iii) लोखंडामध्ये नादमयता, उष्णतावाहकता आणि विद्युतवाहकता हे देखील गुणधर्म दिसून येतात.

५) साखर – i) साखर हा कणरूप स्थायू पदार्थ आहे.

ii) हा पदार्थ पाण्यात विरघळतो म्हणून हा विद्राव्य आहे.

iii) हा पदार्थ चवीला गोड असून उष्णता दिल्यास विरघळल्यावर द्रावण बनते.

६) मीठ – i) मीठ कण कणरूप स्थायू पदार्थ आहे.

ii) हा पदार्थ पाण्यात विरघळतो म्हणून हा विद्राव्य आहे.

iii) हा पदार्थ चवीला खारट आहे.

७) पीठ – i) पीठ हे धान्य दळून तयार केले जाते. हा कणरूप स्थायी पदार्थ आहे.

ii) पीठ पाण्यात विरघळत नसल्याने तो अविद्राव्य पदार्थ आहे.

iii) पिठात योग्य पाणी मिसळून त्याचा स्थायू पदार्थ बनविला जातो.

८) कोळसा – i) कोळसा हा ज्वलनशील स्थायू पदार्थ आहे.

ii) कोळशावर दाब दिल्यास त्याची भुकटी तयार होते. म्हणून ठिसूळपणा हा त्याचा गुणधर्म महत्त्वाचा आहे.

९) माती – माती हा घनपदार्थ असून मातीत अनेक विद्राव्य आणि अविद्राव्य पदार्थ असतात.

१०) पेन – i) पेन स्थायू पदार्थ आहे.

ii) पेन धातू किंवा प्लास्टिकपासून बनवले जाते.

११) शाई – i) शाई हा द्रव पदार्थ असून रंगीत द्रावण आहे.

ii) याला विशिष्ट रंग व वास असतो.

१२) साबण – i) साबण हा स्थायू पदार्थ आहे.

ii) साबण पाण्यात विरघळते व द्रावण तयार होते, म्हणून हे विद्राव्य आहे.

४. संप्लवन म्हणजे काय ते सांगून दैनंदिन जीवनातील संप्लवनशील पदार्थाची नावे लिहा.

उत्तर :

स्थायूरूप पदार्थाचे द्रव न होता थेट वायू अवस्थेत रूपांतर होणे या अवस्थांतराला संप्लवन म्हणतात.

दैनंदिन जीवनातील संप्लवनशील पदार्थाची नावे –

कापूर, डांबराच्या गोळ्या, आयोडीनचे स्फटिक, नवसागर इत्यादी.

५. कशापासून बनवतात ते सकारण लिहा.

अ) ऊस तोडण्याचा कोयता

उत्तर :

ऊस तोडण्याचा कोयता लोखंडापासून बनवतात.

कारण – i) ऊस तोडण्यासाठी दणकट व मजबूत अवजारांची आवश्यकता असते.

ii) लोखंडात कठीणपणा, वर्धनीपणा आणि तन्यता हे धातूचे गुणधर्म असल्यामुळे ऊस तोडण्याचा कोयता लोखंडापासून बनवतात.

आ) घरावर लागणारे पत्रे

उत्तर :

घरावर लागणारे पत्रे अँल्युमिनिअम या धातुपासून बनविलेले असतात.

कारण – i) अँल्युमिनिअम हा धातू वजनाने हलका, टिकाऊ व कणखर असतो.

ii) या धातूला गंज चढत नाही. तसेच ऊन, पवसापासून घराचे संरक्षण होते. म्हणून घरावर लागणारे पत्रे हे अँल्युमिनिअम धातूचे बनविलेले असतात.

इ) स्क्रू ड्रायव्हर

उत्तर :

स्क्रू ड्रायव्हर हा पोलादापासून बनविला जातो.

कारण – i) स्क्रू ड्रायव्हरचा वापर जोडणीसारख्या कठीण कामात सुलभतेने करता यावा म्हणून स्क्रू ड्रायव्हर उच्च प्रतीच्या पोलादापासून बनविला जातो.

ई) पक्कड

उत्तर :

पक्कड पूर्वीच्या कळी पोलादी किंवा लोखंडापासून बनविली जात. परंतु आता मात्र पक्कड स्टेनलेस स्टीलपासून बनविलेली असते.

कारण – पक्कड ही स्वयंपाकाची गरम भांडी उतरवण्यासाठी वापरली जाते. अशा कामासाठी कठीण धातूची आवश्यकता असते.

उ) विजेच्या तारा

उत्तर :

विजेच्या तारा तांबे किंवा अँल्युमिनिअम या धातूच्या बनलेल्या असतात.

कारण – जलद गतीने विजेचे वहन करण्याचा म्हणजे विद्युत वाहकता हा गुणधर्म या धातूंमध्ये असतो. म्हणून विजेच्या तारा किंवा अँल्युमिनिअम या धातूच्या बनविलेल्या असतात.

ऊ) दागिने

उत्तर :

दागिने, सोने, चांदी, प्लॅटिनम या धातूंपासून बनविली जाते.

कारण – या धातूंमध्ये तन्याता हा गुणधर्म असतो. म्हणून दागिने सोने, चांदी, प्लॅटिनम या धातूंपासून बनविली जाते.

ए) पातेले

उत्तर :

पातेले हे अँल्युमिनिअम, स्टेनलेस स्टील, पितळ या धातूंपासून बनविले जाते.

कारण – i) या धातुमध्ये उष्णता वाहकतेचा गुणधर्म असतो.

ii) या धातूंच्या पातेल्यात अन्न शिजविणे सोपे असते.

iii) स्टेनलेस स्टीलच्या पातेल्यात अन्नावर धातुपासून रासायनिक प्रक्रिया होत नाही. म्हणून पातेले या धातूंपासून बनविले जाते.

६. असे केले तर काय होईल आणि का ?

अ) खिळे प्लॅस्टिकचे बनवले.

उत्तर :

तर ते टोकदार बनणार नाही आणि ते हातोडीने टोकतांना तुटून जातील. कारण त्यात कठीणपणा हा गुणधर्म राहणार नाही.

आ) घंटा लाकडाची बनवली.

उत्तर :

तर ती घंटा वाजवणारच नाही. कारण नादमयता हा गुणधर्म लाकडात नसतो.

इ) पक्कडला रबर बसवले नाही.

उत्तर :

तर ती पक्कड गरम होईल आणि हाताला चटके बसतील. कारण त्यातून उष्णतेचे वहन होईल.

ई) चाकू लाकडाचा तयार केला.

उत्तर :

तर त्याने काहीच कापले जाणार नाही. कारण लाकूड हा धातू नसल्याने त्यात काठीणपणा हा गुणधर्म नसतो.

उ) कुऱ्हाड रबराची बनवली.

उत्तर :

तर त्यावर कितीही ताण किंवा दाब दिला आणि काढून घेतल्यास ते पदार्थ मूळ स्थितीत परत येईल. कारण रबरात स्थितिस्थापकता गुणधर्म आहे.

७. मी कोण ?

अ) तुमचा ताप मोजतो, तापमापीत असतो.

उत्तर :

पारा

आ) माझ्याशिवाय गरम नाही, थंड नाही.

उत्तर :

उष्णता

इ) नाही मला आकार !

उत्तर :

पाणी, हवा (द्रवपदार्थ, वायू)

ई) पाण्यात विरघळतो, रॉकेलमध्ये विरघळत नाही.

उत्तर :

मीठ

८. असे का झाले ?

अ) हिवाळ्यात खोबऱ्याचे तेल घट्ट झाले.

उत्तर :

i) हिवाळ्यात वातावरणातील तापमान कमी असते व खोबरेल तेलाचा गोठण बिंदू या तापमानाला येतो.

ii) अशा तापमानात तेल गोठले की घट्ट होते. म्हणून हिवाळ्यात खोवऱ्याचे तेल घट्ट झाले.

आ) प्लेटमध्ये उघड्यावर ठेवलेले रॉकेल नाहीसे झाले.

उत्तर :

i) वातावरणातील तापमानाचा रॉकेलवर परिणाम दिसून येतो.

ii) उघड्यावर ठेवलेल्या रॉकेलचे जास्त तापमानात बाष्पीभवन होते. हळूहळू या द्रवाचे पूर्णपणे बाष्प होऊन ते नाहीसे होते.

इ) एका कोपऱ्यात लावलेल्या अगरबत्तीचा वास दुसऱ्या कोपऱ्यात आला.

उत्तर :

i) पेटविलेल्या अगरबत्तीचा धूर हा वायुरूप असल्यामुळे तो हवेने खोलीत सर्वत्र पसरतो.

ii) अगरबत्तीस सुगंधी द्रव्ये असल्याने धुराबरोबर सुगंधी द्रव्ये एका कोपऱ्यातून दुसऱ्या कोपऱ्यात अगरबत्तीच्या मार्फत पसरतो.

ई)

उत्तर :

सफरचंद व फुगा पाण्यात टाकल्यास फुगा पाण्यावर तरंगतो आणि सफरचंद मात्र पाण्यात बुडतो. कारण सफरचंद हा स्थायू पदार्थ आहे. तो वजनाने जड असल्याने म्हणजेच त्याची घनता जास्त असल्याने ते पाण्यात बुडाले मात्र फुग्यात वायू भरलेला असल्यामुळे तो पाण्यावर तरंगतो.

Leave a Comment