कृषी स्वाध्याय

कृषी स्वाध्याय

कृषी स्वाध्याय इयत्ता सातवी भूगोल

प्रश्न. 1. खालील विधानांसाठी योग्य पर्याय निवडा.

1) या शेतीप्रकारात पीक बदल केला जातो.

अ) सखोल शेती

आ) मळ्याची शेती

इ) व्यापारी शेती

ई) फलोद्यान शेती

उत्तर :

सखोल शेती

2) शेतीसाठी खालीलपैकी योग्य पर्याय द्या.

अ) फक्त नांगरणे

आ) प्राणी, अवजारे, यंत्र व मनुष्यबळाचा वापर

इ) फक्त मनुष्यबळ वापरणे

ई) फक्त पीक काढणे

उत्तर :

प्राणी, अवजारे, यंत्र व मनुष्यबळाचा वापर

3) भारतात शेतीचा विकास झाला आहे, कारण ……………

अ) भारतात शेतीचे दोन हंगाम आहेत.

आ) बहुसंख्य लोक शेतीवर अवलंबून आहेत.

इ) भारतात पारंपरिक शेती केली जाते.

ई) भारतात हवामान, मृदा, पाणी इत्यादी अनुकूल घटकांची उपलब्धता आहे.

उत्तर :

भारतात हवामान, मृदा, पाणी इत्यादी अनुकूल घटकांची उपलब्धता आहे.

4) भारतात शेतीमध्ये आधुनिक पद्धती व तंत्रज्ञानाचा वापर करणे गरजेचे आहे, कारण ………………..

अ) सुधारित बी-बियाण्यांचे कारखाने आहेत.

आ) रासायनिक खतनिर्मिती उद्योग आहेत.

इ) लोकसंख्यावाढ व शेतीवर आधारित उद्योग आहेत.

ई) आधुनिक साधने व यंत्रे उपलब्ध आहेत.

उत्तर :

लोकसंख्यावाढ व शेतीवर आधारित उद्योग आहेत.

प्रश्न. 2. खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा.

1) शेतीसाठी जलसिंचनाचे महत्त्व विशद करा.

उत्तर :

i) भारत मोसमी हवामानातील प्रदेश आहे. भारताला मोसमी वाऱ्यापासून पाऊस मिळते. त्यामुळे येथील शेती पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. मात्र पाऊस हंगामी व अनियमित स्वरूपाचा आहे. शेतीस वर्षभर पाणीपुरवठा होणे आवश्यक आहे.

ii) जेव्हा शेतीतील पिकांची पाण्याची गरज पावसाच्या पाण्यावर भागवली जात नाही तेव्हा कृत्रिमरित्या पाणीपुरवठा केला जातो. म्हणजेच जलसिंचनाची व्यवस्था केली जाते.

iii) पावसाचे पाणी हे विहिरी, कुपनलिका, हौद, तळी, शेततळी खोदून साठवले जाते. त्यावर पंपाच्या साहाय्याने शेतीस पाणी पुरविले जाते.

iv) तसेच जलसिंचनासाठी तुषारसिंचन, ठिंबकसिंचन या तंत्राचा वापर करून शेतीला पाणी पुरविले जाते.

2) जलसिंचनासाठी वापरल्या जाणाऱ्या कोणत्याही दोन पद्धतींची तुलनात्मक माहिती लिहा.

उत्तर :

जलसिंचनासाठी विहिरी, कुपनलिका, तलाव, कालवा, इत्यादींचा वापर केला जातो.

विहिरी व कुपनलिका जलसिंचन – i) विहिरी व कुपनलिका यांच्या खोदाईसाठी अत्यल्प खर्च करावा लागतो. त्यापासून असणारे फायदे मात्र अधिक असतात.

ii) शेतकरी जलसिंचनासाठी सरकारवर अधिक निर्भर न राहता आपल्या सुयोग्य अशा पद्धतीने पीक पद्धतींचे नियोजन करतात.

कालवे जलसिंचन – i) नद्यावर धरणे बांधून त्यात पावसाचे पाणी साठवले जाते व परिसरात कालव्यांद्वारे जलसिंचन केले जाते.

ii) कालवे सिंचनावर मोठा खर्च होतो.

3) शेतीचे प्रमुख प्रकार सांगा आणि सखोल व विस्तृत धान्यशेतीची माहिती लिहा.

उत्तर :

शेतीचे प्रमुख प्रकार पुढीलप्रमाणे आहेत.

1. सखोल शेती – i) कमीत कमी क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त उत्पादन काढण्याचा शेती प्रकार म्हणजे सखोल शेती. हा निर्वाह शेतीचा उपप्रकार आहे.

ii) जास्त लोकसंख्येमुळे किंवा जमिनीचे क्षेत्र मुळातच कमी असल्याने दरडोई शेतजमिनीचे प्रमाण कमी असते.

iii) या प्रकारची शेती प्रामुख्याने विकसनशील प्रदेशात आढळते.

iv) या शेतीपासून मिळणारे बहुतेक उत्पन्न कुटुंबाची अन्नधान्याची गरज भाागवण्यास पुरेल इतके असते.

v) या प्रकारातील शेतकरी व त्यांचे कुटुंब पूर्णपणे शेतीवर अवलंबून असते. शेतीचे उत्पादन कमी असल्यामुळे आर्थिक स्थिती बेताची असते.

2. विस्तृत धान्य शेती – i) विस्तृत धान्य शेती हा व्यापारी शेतीचा उपप्रकार आहे.

ii) या शेतीचे क्षेत्र 200 हेक्टर किंवा अधिक असते. मोठे शेती क्षेत्र व विरळ लोकसंख्या यांमुळे ही शेती यंत्राच्या साहाय्याने केली जाते.

iii) एक पीक पद्धती हे या शेतीचे ठळक वैशिष्ट्य आहे. उदा. गहू किंवा मका. याशिवाय बार्ली, ओट्स, सोयाबीन ही पिकेही काही प्रमाणात घेतली जातात.

iv) या शेतीसाठी मोठी भांडवल गुंतवणूक करावी लागते.

v) समशीतोष्ण गवताळ प्रदेशात या प्रकारची शेती केली जाते.

4) मळ्याच्या शेतीची वैशिष्ट्ये लिहा.

उत्तर :

i) मळ्याची शेती हा व्यापारी शेतीचा उपप्रकार आहे. या शेतीचे क्षेत्र 40 हेक्टर किंवा त्यापेक्षा अधिक असते.

ii) ही शेती डोंगरउतारावर असल्याने यंत्राचा फारसा उपयोग होत नाही. त्यामुळे या शेतीत स्थानिक मनुष्यबळाचे महत्त्व अधिक असते.

iii) प्रदेशातील भौगोलिक स्थिती ज्या पिकास पोषक असते, त्या पिकाची लागवड केली जाते. ही सुद्धा एक पीक पद्धतीची शेती आहे.

iv) या प्रकारच्या शेतीमध्ये अन्नधान्याचे उत्पादन होत नाही, केवळ व्यापारी पिकांचेच उत्पादन घेतले जाते. उदा. चहा, रबर, कॉपी, नारळ, कोको, मसाल्याचे पदार्थ इत्यादी.

v) या प्रकारच्या शेतीची सुरुवात व विस्तार विशेष करून वसाहत काळात झाला. बहुतेक मळ्याची शेती ही उष्ण कटिबंधातच केली जाते.

vi) दीर्घकालिक पिके, शास्त्रशुद्ध पद्धतीचा अवलंब, निर्यातक्षम उत्पादने, प्रक्रिया करणे इत्यादींमुळे शेतीसाठी ही मोठी भांडवल गुंतवणूक करावी लागत .

vii) मळ्याच्या शेतीबाबत हवामान, मनुष्यबळ, पर्यावरण ऱ्हास, आर्थिक व व्यवस्थापन इत्यादी समस्या आहेत.

viii) या प्रकारची शेती भारतासह दक्षिण आशियातील आफ्रिका, दक्षिण व मध्य अमेरिका इत्यादी प्रदेशांत केली जाते.

4) मळ्याच्या शेतीची वैशिष्ट्ये लिहा.

उत्तर :

i) मळ्याची शेती हा व्यापारी शेतीचा उपप्रकार आहे. या शेतीचे क्षेत्र 40 हेक्टर किंवा त्यापेक्षा अधिक असते.

ii) ही शेती डोंगरउतारावर असल्याने यंत्राचा फारसा उपयोग होत नाही. त्यामुळे या शेतीत स्थानिक मनुष्यबळाचे महत्त्व अधिक असते.

iii) प्रदेशातील भौगोलिक स्थिती ज्या पिकास पोषक असते, त्या पिकाची लागवड केली जाते. ही सुद्धा एक पीक पद्धतीची शेती आहे.

iv) या प्रकारच्या शेतीमध्ये अन्नधान्याचे उत्पादन होत नाही, केवळ व्यापारी पिकांचेच उत्पादन घेतले जाते. उदा. चहा, रबर, कॉपी, नारळ, कोको, मसाल्याचे पदार्थ इत्यादी.

v) या प्रकारच्या शेतीची सुरुवात व विस्तार विशेष करून वसाहत काळात झाला. बहुतेक मळ्याची शेती ही उष्ण कटिबंधातच केली जाते.

vi) दीर्घकालिक पिके, शास्त्रशुद्ध पद्धतीचा अवलंब, निर्यातक्षम उत्पादने, प्रक्रिया कारणे इत्यादींमुळे शेतीसाठी ही मोठी भांडवल गुंतवणूक करावी लागते.

vii) मळ्याच्या शेतीबाबत हवामान, मनुष्यबळ, पर्यावरण ऱ्हास, आर्थिक व व्यवस्थापन इत्यादी समस्या आहेत.

viii) या प्रकारची शेती भारतासह दक्षिण आशियातील आफ्रिका, दक्षिण व मध्य अमेरिका इत्यादी प्रदेशांत केली जाते.

5) तुमच्या जवळच्या भागात कोणकोणती पिके होतात ? त्याची भौगोलिक कारणे कोणती ?

उत्तर :

आमच्या जवळच्या भागात ज्वारी, कापूस, ऊस, संत्री इत्यादी पिके होतात.

भौगोलिक कारणे – i) या पिकांना काळी कसदार मृदा, उबदार हवामान व मध्यम स्वरुपाच्या पावसाची आवश्यकता असते.

ii) ऊसाच्या पिकाला जास्त पाण्याची गरज असते. त्यामुळे या भागात जलसिंचनाच्या सोई उपलब्ध आहेत.

6) भारतातील शेतीचे स्वरूप हंगामी असण्याचे कारण काय ? बारमाही शेती करण्यात कोणत्या अडचणी आहेत ?

उत्तर :

i) भारत देश हा शेती प्रधान देश आहे. शेती हा येथील प्रमुख व्यवसाय आहे. भारतीय हे मोसमी प्रकारचे आहे. भारतात मोसमी वाऱ्यांपासून पाऊस पडते.

ii) भारतातील पाऊस हा हंगामी व अनियमित स्वरूपाचा आहे.

iii) भारतीय शेती ही पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. इथे जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या चार महिन्यांच्या कालावधीत पाऊस पडतो. म्हणून भारतातील शेतीचे स्वरूप हंगामी आहे.

बारमाही शेती करण्यात येणाऱ्या अडचणी – i) शेतीस वर्षभर नियमित पाणीपुरवठा उपलब्ध नसणे.

ii) शेतकऱ्यांनी पिकवलेला माल योग्य दरात व योग्य वेळेत ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी विपणन व्यवस्था आवश्यक असते. परंतु भारतातील अनेक शेतकरी आर्थिकदृष्ट्या दुर्बल असल्याने शेतीमालाचे विपणन स्वत: करू शकत नाही.

iii) वाहतुकीच्या व साठवणुकीच्या अपुऱ्या सोईसुविधा.

iv) तसेच हवामानात अनियमितता असणे.

Leave a Comment