वारे स्वाध्याय

वारे स्वाध्याय

वारे स्वाध्याय इयत्ता सातवी भूगोल

प्रश्न. 1. योग्य पर्याय निवडून वाक्य पूर्ण करा.

1) हवा प्रसरण पावली, की ………………

अ) घन होते.

आ) नाहीशी होते.

इ) विरळ होते.

ई) दमट होते.

उत्तर :

हवा प्रसरण पावली, की विरळ होते.

2) वारे हवेच्या जास्त दाबाकडून …………………

अ) आणखी जास्त हवेच्या दाबाकडे वाहतात.

आ) थंड हवेच्या दाबाकडे वाहतात.

इ) हवेच्या कमी दाबाकडे वाहतात.

ई) आहे तेथेच राहतात.

उत्तर :

वारे हवेच्या जास्त दाबाकडून हवेच्या कमी दाबाकडे वाहतात.

3) उत्तर गोलार्धात विषुववृत्ताकडे येणारे वारे पृथ्वीच्या परिवलनामुळे ………………

अ) दक्षिणेकडे वळतात.

आ) पूर्वेकडे वळतात.

इ) पश्चिमेकडे वळतात.

ई) उत्तरेकडे वळतात.

उत्तर :

उत्तर गोलार्धात विषुववृत्ताकडे येणारे वारे पृथ्वीच्या परिवलनामुळे पश्चिमेकडे वळतात.

4) भारतीय उपखंडावरुण वाहणाऱ्या हंगामी वाऱ्यांची दिशा हिवाळ्यात ……………….

उत्तर :

अ) आग्नेयेकडून वायव्येकडे असते.

आ) नैर्ऋत्येकडून ईशान्येकडे असते.

इ) ईशान्येकडून नैर्ऋत्येकडे असते.

ई) वायव्येकडून आग्नेयेकडे असते.

उत्तर :

भारतीय उपखंडावरुण वाहणाऱ्या हंगामी वाऱ्यांची दिशा हिवाळ्यात ईशान्येकडून नैर्ऋत्येकडे असते.

5) ‘गरजणारे चाळीस’ वारे दक्षिण गोलार्धात …………………

अ) विषुववृत्ताकडे वाहतात.

आ) 40° दक्षिण अक्षांशाच्या भागात वाहतात.

इ) ध्रुवीय कमी दाबाच्या प्रदेशाकडून वाहतात.

ई) 40° उत्तर अक्षांशाच्या भागात वाहतात.

उत्तर :

‘गरजणारे चाळीस’ वारे दक्षिण गोलार्धात 40° दक्षिण अक्षांशाच्या भागात वाहतात.

प्रश्न. 2. खालील वर्णनावरून वाऱ्यांचा प्रकार ओळखा.

1) नैर्ऋत्येकडून येणारे वारे भारतीय उपखंडावर पाऊस आणतात. जून ते सप्टेंबर या काळात भारतात पाऊस पडतो. या कालावधीनंतर हे वारे परत फिरतात.

उत्तर :

नैर्ऋत्ये मोसमी वारे

2) उत्तर ध्रुवीय प्रदेशांकडून 60° उत्तरेकडे येणाऱ्या या वाऱ्यांमुळे उत्तर अमेरिका, युरोप व रशिया एवढ्या विस्तीर्ण प्रदेशात थंडीची तीव्रता वाढते.

उत्तर :

ध्रुवीय वारे

3) डोंगरमाथे दिवसा लवकर तापतात. तेथील हवा तापून हलकी होते व वर जाते. त्यामुळे या भागात कमी दाब निर्माण होतो. त्याच वेळी डोंगरपायथ्याशी दरीखोऱ्यांत हवा थंड असल्याने जास्त दाब असतो. तेथील हवा कमी दाबाकडे वाहते.

उत्तर :

दरीय वारे

प्रश्न. 3. पुढे हवेचा दाब क्रमवार मिलिबारमध्ये दिलेला आहे. त्यावरून आवर्त व प्रत्यावर्ताची आकृती काढा.

910, 994, 996, 1000

1030, 1020, 1010, 1000

उत्तर :

प्रश्न. 4. एकच भौगोलिक कारण लिहा.

1) विषुववृत्ताजवळ हवेचा पट्टा शांत असतो.

उत्तर :

कारण – विषुववृत्ताच्या उत्तर व दक्षिणेस सुमारे 5° अक्षवृत्तापर्यंत वर्षातील बराच काळ हवा शांत असल्याने तेथे वारे वाहत नाहीत. म्हणून विषुववृत्ताजवळ हवेचा पट्टा शांत असतो.

2) उत्तर गोलार्धातील नैर्ऋत्य वाऱ्यांपेक्षा दक्षिण गोलार्धात वायव्येकडून येणारे वारे जास्त वेगाने वाहतात.

उत्तर :

कारण – i) उत्तर गोलार्धात भूभाग जास्त असून भूपृष्ठाच्या उंचसखलपणाचा अडथळा असल्यामुळे वाऱ्याच्या वेगावर मर्यादा येतात.

ii) दक्षिण गोलार्धात जलभाग जास्त आहे. या गोलार्धात भूपृष्ठाच्या उंच सखलपणाचा अडथळा नाही.

iii) कोणत्याही प्रकारचे नियंत्रण नसल्यामुळे उत्तर गोलार्धातील नैर्ऋत्य वाऱ्यांपेक्षा दक्षिण गोलार्धात वायव्येकडून येणारे वारे जास्त वेगाने वाहतात.

3) उन्हाळ्यातील मोसमी वारे समुद्राकडून, तर हिवाळ्यातील परतीचे मोसमी वारे जमिनीकडून येतात.

उत्तर :

कारण – i) उन्हाळ्यात जमिनीचे संपूर्ण तापमान जास्त असते, त्यामुळे वायुदाब अतिशय कमी असतो. उलट समुद्रावर तापमान कमी असल्याने वायुदाब जास्त असतो. त्यामुळे उन्हाळ्यात मोसमी वारे समुद्राकडून जमिनीकडे येतात.

ii) तर याउलट स्थिती हिवाळ्यात असते. हिवाळ्यात जमिनीचे संपूर्ण तापमान कमी असते. त्यामुळे वायुदाब अतिशय जास्त असतो. तर समुद्रावरील हवेचा दाब कमी असतो. त्यामुळे हिवाळ्यातील परतीचे मोसमी वारे जमिनीकडून येतात.

4) वारे वाहण्यासाठी हवेच्या दाबामध्ये फरक असावा लागतो.

उत्तर :

कारण – i) पृथ्वीवर हवेचा दाब एकसमान नसतो. जास्त दाबाच्या पट्ट्याकडून कमी दाबाच्या पट्ट्याकडे हवेची हालचाल क्षितिज समांतर दिशेत होते. या हालचालीमुळे वाऱ्याची निर्मिती होते.

ii) हवेच्या दाबातील फरक जेथे कमी असेल, तेथे वारे मंद गतीने वाहतात. याउलट जेथे हवेच्या दाबातील फरक अधिक असेल, तेथे वारे वेगाने वाहतात. म्हणून वारे वाहण्यासाठी हवेच्या दाबामध्ये फरक असावा लागतो.

प्रश्न. 5. पुढील ओघतक्ता पूर्ण करा.

उत्तर :

प्रश्न. 6. थोडक्यात उत्तरे लिहा.

1) ध्रुवीय भागात दोन्ही गोलार्धात हवेचा दाब जास्त का असतो ?

उत्तर :

i) ध्रुवीय प्रदेशात तापमान अतिशय कमी असते. दोन्ही गोलार्धात वर्षभर तापमान 0° सेल्सिअमपेक्षाही कमी असते. त्यामुळे तेथे वर्षभर हवा थंड व जड असल्याने ध्रुवीय भगात दोन्ही गोलार्धात हवेचा दाब जास्त असतो.

2) पृथ्वीच्या परिवलनाचा वाऱ्यांवर कोणता परिणाम होतो ?

उत्तर :

i) पृथ्वीच्या परिवलनाचा परिणाम वाऱ्याच्या वाहण्याच्या दिशेवर होतो. उत्तर गोलार्धात वारे आपल्या मूळ दिशेपासून उजवीकडे वळतात, तर दक्षिण गोलार्धात ते मूळ दिशेच्या डावीकडे वळतात.

ii) पश्चिमेकडून पूर्वेकडे होणाऱ्या पृथ्वीच्या परिवलनामुळे त्यांच्या मूळ दिशेत बदल होतो.

iii) वारे ज्या दिशेकडून वाहत येतात, त्या दिशेच्या नावाने ते ओळखले जातात. उदा. पश्चिमी वारे म्हणजे पश्चिमकडून येणारे वारे.

3) आवर्त वारे चक्राकार दिशेनेच का वाहतात ?

उत्तर :

i) एखाद्या प्रदेशात केंद्रस्थानी अत्यंत कमी दाब असला व त्याच्या भोवताली सर्व दिशांना वायुदाब वाढत असला तर यात संबोवतालच्या भागातून सर्व दिशांनी हवा दाबाच्या मध्यवर्ती केंद्राकडे वाहू लागते व दाब उतारानुसार तिची वाहण्याची दिशा असते.

ii) परंतु पृथ्वीच्या परिवलनामुळे फेरलेल्या नियमाप्रमाणे वाऱ्यांच्या दिशेने बदल होतो व प्रत्यक्षात ते समदाब रेषांना समांतर न वाहता त्यांच्याशी कोन करून वाहतात.

iii) समदाब रेषांशी कोन करून वाहत असल्याने त्यांना चक्राकार गती प्राप्त होते. दाब उतार तीव्र असल्यास चक्राकार गतीने वाहणारे हे वारे खूप जोरात वाहतात. अशाप्रकारे आवर्त वारे चक्राकार दिशेनच वाहतात.

4) आवर्त वाऱ्यांची कारणे व परिणाम लिहा.

उत्तर :

आवर्त वाऱ्यांची कारणे – i) केंद्रस्थानी किंवा एखाद्या ठिकाणी हवेचा दाब कमी असणे.

ii) सभोवताली हवेचा दाब जास्त असणे.

आवर्त वाऱ्याचे परिणाम – i) आवर्त वाऱ्यामुळे आकाश ढगाळ असते.

ii) वारे वेगाने वाहतात आणि भरपूर पाऊस पडतो.

Leave a Comment