शिवाजी महाराज पन्हाळगडावरुन कसे निसटले ?
उत्तर :
i) शिवाजी महाराज पन्हाळगडाच्या वेढ्यात अडकले होते. त्यावेळी महाराजांनी सिद्दीशी बोलणी केल्यामुळे सिद्दीने पन्हाळगडावरील वेढ्यामध्ये शिथिलता निर्माण केली.
ii) या प्रसंगी गडावरील शिवा काशिद या बहादूर तरुणाने पुढाकार घेतला. तो दिसायला शिवरायांसारखच होता. त्याने शिवाजी महाराजांची वेशभूषा करून तो पालखीत बसला.
iii) पालखी राजदिंडी दरवाज्यातून बाहेर पडली. सिद्दीच्या सैन्याने ती पालखी पकडली. प्रसंग बाका होता. शिवा काशिदने या प्रसंगी स्वराज्यासाठी बलिदान केले.
iv) या दरम्यान शिवाजीमहाराज दुसऱ्या अवघड वाटेने गडाबाहेर पडले. अशाप्रकारे शिवाजीमहराज पन्हाळगडावरुन निसटले.