शिवरायांनी आरमार उभारणीकडे लक्ष का दिले ?
उत्तर :
i) शिवाजी महाराजांनी जावळीचा प्रदेश जिंकल्यानंतर रायगडही जिंकून घेतला.
ii) जावळीच्या विजयामुळे महाराजांचे कोकणातील प्रदेशाकडे लक्ष गेले. त्यांनी किनारपट्टीवरील कल्याण व भिवंडी ही ठिकाणे जिंकली.
iii) त्यावेळी त्यांचा संबंध पश्चिम किनारपट्टीवरील सिद्दी, पोर्तुगीज आणि इंग्रज या सत्तांसोबत आला आणि या सत्तांशी संघर्ष करायचा असेल तर आपल्याला प्रबळ असे आरमार उभारले पाहिजे, हे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे शिवरायांनी आरमार उभारणीकडे लक्ष दिले.